नवी दिल्ली, दि. १७ सप्टेंबर २०२५ – India Pakistan Cricket News आशिया चषक २०२५ मध्ये भारत–पाकिस्तान सामन्यानंतर नवा वाद पेटला आहे. भारतीय संघाने सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने पाकिस्तानने थेट आशिया चषकातून माघार घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.
रविवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला होता. मात्र, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर हस्तांदोलन टाळण्याचा निर्णय घेतला. या कृतीचा निषेध करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सामना रेफरीवर कारवाईची मागणी केली होती.
पाकिस्तानचा सामना रद्द, युएईला सुपर-४ चे तिकीट(India Pakistan Cricket News)
आज पाकिस्तानचा सामना युएईशी होणार होता. मात्र, पाकिस्तानी संघाने हॉटेलमधून स्टेडियमकडे निघण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तान थेट स्पर्धेतून बाहेर पडला असून युएईला वॉकओव्हर मिळणार आहे. या निर्णयामुळे युएईला दोन गुण मिळतील आणि ते ग्रुप ‘अ’ मध्ये दुसऱ्या स्थानावर जात सुपर-४ मध्ये प्रवेश करतील.
आयसीसीची भूमिका कठोर
PCB ने सामना रेफरी अँडी पायकॉफ्ट यांना हटवण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. परंतु, दबावाखाली अधिकारी बदलण्याचा पायंडा पडू नये म्हणून आयसीसी ही मागणी मान्य करण्यास तयार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या माघारीनंतर आयसीसीकडून शिस्तभंगात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान आशिया चषकाच्या ग्रुप स्टेजमध्येच बाद
युएई थेट सुपर-४ मध्ये पोहोचणार
आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर दंडात्मक कारवाई करू शकते
भारत–पाक क्रिकेट वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे
या निर्णयामुळे आशिया चषकाचा रंग पालटला असून भारत-पाकिस्तान सामन्यानंतरचा राजकीय वाद थेट क्रिकेटमध्ये ओढला गेल्याचं स्पष्ट होत आहे.