‘शतकांच्या प्रतिक्षेनंतर प्रभुराम आले ;आज नव्या युगाची सुरुवात झाली :पंतप्रधान नरेंद्र मोदी 

0

अयोध्या,दि,२२ जानेवारी २०२४ –शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आपल्या प्रभु रामाचे आगमन झाले आहे. हा अलौकिक क्षण आहे, हा क्षण पवित्र असल्याचे त्यांनी सांगितले. २२ जानेवारी ही नवीन वेळ चक्राची उत्पत्ती आहे.शतकानु शतकांच्या संयमाचा वारसा आज सापडल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. हजारो वर्षांनंतरही या दिवसाची चर्चा होणार  अयोध्येतील श्री रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

ते पुढे म्हणाले की, रामलला आता तंबूत राहणार नाहीत. ते एका भव्य मंदिरात राहणार आहे.जे घडले ते देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील रामभक्तांना अनुभूति आली आहे , यावर माझा ठाम विश्वास आहे. हा क्षण अलौकिक आहे…हे वातावरण, हा क्षण आपल्या सर्वांवर प्रभू श्री रामाचा आशीर्वाद आहे.

मोदी म्हणाले, या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. मी नुकतेच तुम्हा सर्वांसमोर गर्भगृहात ऐश्वर्य चैतन्याची अनुभूती घेऊन तुमच्या समोर  उपस्थित  झालो आहे. सांगण्यासारखं खूप काही आहे पण  मला शब्द सुचत नाही आहे. ते म्हणाले की २२ जानेवारी २०२४ चा हा सूर्य एक अद्भुत आभा घेऊन आला आहे. ही कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही, तर ती काळाच्या नवीन चक्राची उत्पत्ती आहे.ते म्हणाले की, राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर संपूर्ण देशात उमंग आणि उत्साह वाढला  आहे. बांधकामाचे काम पाहून देशवासीयांमध्ये रोज एक नवा आत्मविश्वास निर्माण होत होता. शतकानुशतके सहनशीलतेचा वारसा आज आपल्याला मिळाला आहे. आज आपल्याला श्री रामाचे मंदिर मिळाले आहे.

गुलामगिरीची मानसिकता झुगारून उभं राहणारे राष्ट्र, भूतकाळातील प्रत्येक दंशातून हिंमत घेणारे राष्ट्र अशा प्रकारे नवा इतिहास घडवते, असे पंतप्रधान म्हणाले. आजपासून हजार वर्षांनंतरही लोक या तारखेबद्दल, या क्षणाबद्दल बोलतील. ते म्हणाले की, आज मी प्रभू श्री रामाचीही माफी मागतो.आमच्या  परिश्रमात, त्याग आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी कमतरता असावी की आम्ही  हे कार्य इतक्या शतकांपासून करू शकलो नाही.आज ती उणीव भरून निघाली आहे. मला विश्वास आहे की आज प्रभू राम आपल्याला नक्कीच क्षमा करतील. ते म्हणाले की, भारताच्या संविधानाच्या पहिल्या प्रतमध्ये प्रभू राम उपस्थित आहेत. राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतरही भगवान श्री राम यांच्या अस्तित्वावरून अनेक दशके कायदेशीर लढाई सुरूच होती. न्यायाची प्रतिष्ठा जपणाऱ्या भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो.

अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराच्या उभारणीत सहभागी  कामगारांचा सत्कार करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सोमवारी अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात श्री रामललाच्या नवीन मूर्तीचा अभिषेक पूर्ण झाला आणि देश-विदेशातील लाखो रामभक्तांनी त्याचे साक्षीदार होते. अभिषेक प्रसंगी लष्कराच्या हेलिकॉप्टरने नव्याने बांधलेल्या रामजन्मभूमी मंदिरावर पुष्पवृष्टी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठापनेची विधी संपन्न झाला. गेल्या काही महिन्यांपासून अयोध्येत या भव्य सोहळ्याची तयारी सुरू होती. अखेर आज मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा पार पडला.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.