मुंबई – महाराष्ट्र राज्य राज्य परिवहन मंडळाची भुसावळ-बोईसर मार्गावरील एसटी बसला सकाळी सहा वाजता पालघरच्या वाघोबा खिंडीत भीषण अपघात झाला.बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दरीत कोसळली आहे.या अपघातामध्ये किमान १५ ते २० प्रवासी जखमी हल्ल्याचे समजते आहे.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व जखमींना पालघरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार रातराणी बस सेवेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या बसचा चालक नाशिक येथे बदलण्यात आला. या चालकाने मद्यपान केल्याचे प्रवाशांचे म्हणणे असून भरधाव गाडी चालवणाच्या नादात पालघरच्या आधी वागोबा घाटात बस सकाळी सहाच्या सुमारास दरीमध्ये उलटली.
बस मधील प्रवाश्यांनी सांगितले,आम्ही कंडक्टरला सांगत होतो की, चालक मद्यधुंद अवस्थेत आहे. त्याच्या हातामध्ये गाडीचं स्टेअरिंग देऊ नये. तरी कंडक्टरने आमचं न ऐकता चालकाची पाठराखण केली. मात्र चालक फार भयंकर पद्धतीने अगदी वेगात गाडी चालवत होता. त्यामुळेच हा अपघात झाला, असा दावा या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांनी केलाय.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढत पालघरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. बस चालक मद्यपान करून भरधाव वेगानं गाडी चालवत असल्याने हा अपघात झाला असं प्रवाशांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र: पालघर में एक बस के 25 फीट गहरी खाई में गिरने से 15 लोग घायल हुए। pic.twitter.com/ehxOlQWRh1
— ANI_HindiNews (@AHindinews) May 27, 2022