अभिजीत-वैभवमध्ये राडा;निक्की अन् अभिजीतच्या मैत्रीत येणार दुरावा ?

वाचा संग्राम चौगुलेच्या संघर्षाची कहाणी

0

मुंबई,दि,११ सप्टेंबर २०२४ – ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रोज एक राडा पाहायला मिळत आहे. गेम खेळण्या सोबत वारंवार भांडणेदेखील केली जात आहेत. घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला. त्यामुळे घरातील वातावरण बिघडलेले पाहायला मिळत आहे. आज अभिजीत आणि वैभवमध्ये राडा झालेला पाहायला मिळणार आहे. निक्की आणि अभिजीत मधील विश्वास आणि मैत्रीत तडा गेलाला पाहायला मिळालं आहे.

बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये अभिजीत आणि वैभव वाद घालताना दिसत आहेत. अभिजीत वैभवला म्हणतोय,”अरे बाबा मी तुझ्या मागे नाही बोललोय”. दरम्यान मध्ये पडत निक्की म्हणतेय,”आम्ही याच्यावर परत विश्वास ठेवला आणि त्याने तेच केलं”. यावर अभिजीत निक्कीला म्हणतोय,”मित्र समजून मी तुझ्याकडे बोलायला येतो ना हीच माझी चूक आहे. यापुढे तू माझ्याकडे येऊ नको मी तुझ्याकडे येणार नाही. असा मित्र आयुष्यात कधी ठेऊ नये”

अभिजीत निक्कीचं भांडण सुरूच
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अभिजीत आणि निक्कीचं नॉमिनेशनवरुन भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. अभिजीत निक्कीला म्हणतोय,”नॉमिनेशनचा आणि जान्हवीचा काय संबंध”. निक्की म्हणतेय,”जान्हवी तुला तुझ्या टीममध्ये हवी होती”. या आठवड्यात निक्की नॉमिनेट झाल्याने ती अभिजीतकडे आपला संताप व्यक्त करत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात वर्षा ताई अन् निक्कीची तू-तू, मैं-मैं संपेचना;आज भाजीवरुन भांडण
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा आता सातवा आठवडा सुरू आहे. गेल्या आठवड्यात छोटा पुढारी घन:श्याम दरवडे घराबाहेर गेला. तर या आठवड्यातही एका सदस्याचा घरातील प्रवास संपणार आहे. त्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन कार्य पार पडलं. या आठवड्यात सूरज घराचा कॅप्टन असल्याने तो सेफ आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये निक्की आणि वर्षा ताईंमध्ये भाजीवरुन भांड्याला भांड लागलेलं पाहायला मिळत आहे. निक्की म्हणतेय,”इथे लोकांना या घरात लोकांना अन्न मिळत नाही आणि यांनी सरळ भाजी फेकली आहे”. त्यावर उत्तर देत वर्षा ताई म्हणतात,”कारण मला ती खराब वाटली”. पुढे दोघांची तू-तू, मैं-मैं पाहणं मात्र रंजक ठरणार आहे.

हे’ सदस्य झालेत नॉमिनेट
‘बिग बॉस मराठी’चा सध्या सातवा आठवडा सुरू आहे. सातव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क नुकताच पार पडला आहे. सातव्या आठवड्यात अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि आर्या जाधव हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगलीय वर्षा ताईंची चर्चा; कारणं आहेत वेगवेगळी
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील वर्षा ताई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आजही घरातील सदस्य त्यांच्याबद्दल बोलताना दिसणार आहेत. अंकिता, पॅडी आणि सूरज गार्डन एरियामध्ये वर्षा ताईंबद्दल बोलताना दिसणार आहेत. अंकिता म्हणतेय,”जी गोष्ट आपल्याला जमत नाही..त्यातून लांब व्हा”. तर पॅडी दादा म्हणतोय सॉरी बोलून विषय संपवायला हवा.

निक्की आणि वर्षा ताईंमध्येदेखील भाजीवरुन वाद झालेला पाहायला मिळेल. त्यानंतर निक्की वर्षा ताईंना म्हणतेय,”आता दुसरं काय फेकायचं याचं प्लॅनिंग करताय का?”. निक्कीच्या बोलण्यावर वर्षा ताई म्हणत आहेत,”असं हवेत उडवते मी”. पुढे निक्की आणि अरबाज वर्षा ताईंबद्दल बोलताना दिसून येतील.
मराठी मनोरंजन सृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात बिग बॉस मराठीच्या घरातील पहिल्या दिवसापासूनच ‘तू तू मै मै’ झालेलं पाहायला मिळत आहे. आज पॅडी दादा अंकिताला म्हणताय,”एका लेव्हलनंतर वर्षा ताईंवर आपण आवाज वाढवू शकत नाही”. एकंदरीतच वर्षा ताईंनी भाजी फेकलेली घरातील कोणत्याच सदस्याला आवडलेलं नाही आहे.

वाचा संग्राम चौगुलेच्या संघर्षाची कहाणी

Bigg Boss Marathi/ Rada in Abhijeet-Vaibhav; Will there be a rift in Nikki and Abhijeet's friendship?
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर यंदाची पहिली वाइल्ड एन्ट्री संग्राम चौगुलेची झाली.कोल्हापूरचा बॉडीबिल्डर असणाऱ्या संग्रामचा महाराष्ट्रभर चांगलाच बोलबाला आहे. फिटनेस फ्रिक असणारा संग्राम खरंतर इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात त्याने याबद्दल भाष्य केलं आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्यांना आज संग्राम त्याच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी सांगताना दिसणार आहे. संग्राम म्हणतोय,”इंजीनीअरिंग सोडून बॉडीबिल्डर होण्याचा मी निर्णय घेतला. मला शिक्षणात रस नसल्याचं मी थेट कॉलेजमध्ये जाऊन प्रमुखांना सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी मला पाठिंबा दिला. तुला जे करायचं ते कर पण त्यात टॉप कर, असं ते मला म्हणाले होते. दरम्यान तीन हजार रुपयांची मला स्पॉनरशिप मिळाली. घरातून मला फक्त पाच हजार मिळायचे. त्यातला अडीच हजार रुपये भाडं, एक हजार रुपये जेवण आणि 1500 रुपयांत फक्त महिना काढावा लागत असे”.
लाल मातीतले रांगडे गडी असणाऱ्या संग्रामच्या मनगटात ताकद आहे. बोलण्यात वजन, वागण्यात कोल्हापुरी बाणा आहे. बलवान असणारे संग्राम आजच्या घडीला महाराष्ट्राची शान आहेत. संग्रामचा बिग बॉस मराठीच्या घरातला पुढचा प्रवास कसा असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

पॅडी भाऊंचा सूरजला सल्ला
‘बिग बॉस मराठी’चा नवीन सीझन सुरू होऊन 45  दिवस पूर्ण झाले. संग्रामच्या येण्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रत्येक जण प्लँनिंग  करण्यामागे लागले आहेत. प्रत्येक सदस्याच्या डोक्यात नवा गेम शिजत आहे. या वीकचा कॅप्टन सूरज असून तो आता घरातच ताबा उचलण्याचा प्रयत्न करत आहे.

आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये, तुम्ही पाहू शकता की, पॅडी भाऊ सूरजला काही गेम बद्दल सल्ला देत आहेत. पॅडी म्हणतात की ,” कुठल्या गोष्टींवर नॉमिनेट करायचे हे मी आता तुला सांगतो. जर मागील आठवड्याच्या निकषावर असे म्हटले तर, मागच्या आठवड्यात ज्या ज्या गोष्टी झाल्या. कोणती माणसे  चुकीचे वागलीत मग त्यांना नॉमिनेट करायचे. जर गेम बद्दल म्हणाले तर, मागच्या आठवड्यात जे खेळ झाले. खेळात कोण चुकीचे वागले. हे तू डोक्यात फिट करून ठेव. सूरज त्यावर म्हणाला की ,”असे तुम्ही मला रोज सांगता जा.” त्यावर पॅडी म्हणाले, ” हो मी सांगतो. हे सगळे सल्ल्याचे पैसे मी लिहून ठेवणार. एका दिवसाचे 10 हजार आणि जर तुला पटत नसेल तर जा निक्कू ताईकडे ती देईल तुला सल्ले. घनश्याम नंतर आता तूच आहेस. तिच्या कडे मसाज करायला बरोबर जातोस तू.” त्यावर सुरज म्हणाला,” निक्कू ताई ही घनश्यामची कॉपी आहे माझी नाही. तिने मला बोलावले होते की ये डोक्याची मसाज करते.” त्यावर पॅडी म्हणाले,” की उदय ती तुला बोलले की या लोकांना नॉमिनेट कर ही कारणे देऊन. तू करशील का मग? ती हे पण बोलले की मी तुझी मसाज केली तू मला करू नकोस मग काय करणार तू? त्यावर सुरज म्हणाला ,” मला नाही आवडत ती. माझे काही विचार आहेत की नाही? मी माझ्या स्वतःच्या मनाचे ऐकणार. कोणाचे पण ऐकून मी कोणाला नॉमिनेट नाही करणार.”

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.