कोटा – राजस्थानातील कोटा जिल्ह्यात कारने लग्नाला जात असतांना झालेल्या भीषण अपघातात नवरदेवासह एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास कार गाडी नदीत पडल्याने सर्वांचा मृत्यू झाला आहे.अपघाताच्या वेळी घटनास्थळी आसपास कोणीच नव्हतं. त्यामुळे कारमधील कोणालाही वाचवता आलं नाही.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतआणि बचाव कार्य सुरू केलं सर्व मृतदेह बाहेर काढले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
रविवारी सकाळी अपघाताची माहिती मिळताच बचाव दलासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीम राबवून नदीत बुडालेल्या सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंब शनिवारी सायंकाळी बरवाडा येथून कारने उज्जैनकडे जात होते. या कारमध्ये एकाच कुटुंबातील ९ जण होते. यामध्ये नवरदेव देखील होता. दरम्यान कारचा वेग अधिक असल्याने आणि अंधारामुळे कालव्याची काठ न दिसल्याने कार थेट नदीत कोसळली असे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.
ही भीषण अपघाताची माहिती समजताच राजस्थान सरकारचे मंत्री शांती धारीवाल यांनी शोक व्यक्त केला आहे. यासोबतच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे. त्याचबरोबर बचावकार्य आणि तपासाला गती देण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Rajasthan | Eight people died after their car fell off Chhoti Puliya and into the Chambal river in Kota. The occupants of the car were going to a wedding. The car was retrieved with the help of a crane. pic.twitter.com/TYjWlioP2q
— ANI (@ANI) February 20, 2022