अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबाद मध्ये गुन्हा दाखल 

0

औरंगाबाद  – राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे १ मे रोजी झालेल्या सभेसाठी अटी व शर्थींसह परवानगी देण्यात आली होती. मात्र सभेदरम्यान या अटींचे पालन झाले नाही आणि नियम देखील मोडले गेल्याने  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.या संदर्भात सिटीचौक पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गजानान इंगळे यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार राज ठाकरे, राजीव जेवळीकर व इतर आयोजकांविरोधात गुरन -१२७/२०२२ कलम ११६,११७,१५३ भादवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल आहे. याबाबत अधिक तपास सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी हे तपास करत आहेत.

औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी ४ तारखेला घोषित केलेले हनुमान चालीसा आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी ४० मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. हनुमान चालीसा म्हटले तर सामाजिक तेढ निर्माण होईल,अशांतता पसरेल म्हणून कलम १४९ अंतर्गत या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.  मनसेचे ३ प्रमुख पदाधिकारी यांना पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून या नोटीस देण्यात आल्या.तसेच मुंबई मध्ये मनसे कार्यकर्त्यानकडून भोंगे जप्त करून काही पदाधिकाऱ्यांना पोलिसानी ताब्यात घेतले आहे.

पोलीस महासंचालक यांची पत्रकार परिषद संपून काही तास उलटत नाही तोच औरंगाबादच्या सीटी चौक पोलीस स्थानकात राज ठाकरे यांच्याविरोधात पोलीस उप निरीक्षक गजानन इंगळे यांनी गुन्हा नोंदविला आहे.  कलम ११६, ११७, १५३ भादवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ या कलमांतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज ठाकरे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज ठाकरे यांना अटक झाल्यास त्याचे राज्यभर पडसाद उमटतील. २००८ सालीही राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!