भारत पाकिस्तानवर कधीही हल्ला करू शकतो ! पाकच्या संरक्षण मंत्र्याने केली भीती व्यक्त

उरी धरणातून जादा पाणी सोडून भारताची पाकिस्तानवर वॉटरस्ट्राइक

0

नवी दिल्ली,दि,२९ एप्रिल २०२५ –पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान मध्ये प्रचंड भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. भारताने पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. भारत सरकारने कठोर भूमिका घेत सिंधु जल करार रद्द केला तसेच उरी धरणातून जादा पाणी सोडून पाकिस्तानवर वॉटरस्ट्राइक केला आहे. त्यामुळे अनेक गावांना पुराचा तडाखा बसला आहे.

झेलम नदीला पूर आला असून मुझफ्फराबादमधील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. अशातच आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करू शकतो, अशी भिती व्यक्त केली आहे. पाकिस्तानी लष्कराने भारताच्या संभाव्य हल्ल्याची माहिती सरकारला दिली आहे. पाकिस्तानने लष्कराला हाय अलर्टवर ठेवले आहे. जर आमच्या अस्तित्वाला थेट धोका असेल तर आम्ही अण्विक शस्त्राचाही वापर करू, अशी पोकळ धमकी आसिफ यांनी दिली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!