ज्येष्ठ चित्रकार दीपक वर्मा यांच्या “रंग रेषा”चित्रप्रदर्शनाचे उदघाटन
६ ते १२ फेब्रुवारी पर्यंत मुंबईच्या जहाँगीर आर्ट गॅलरीत आयोजन
मुंबई,दि,७ फेब्रुवारी २०२४ – ज्येष्ठ चित्रकार दीपक वर्मा यांच्या “रंग रेषा” लँडस्केप चित्रप्रदर्शनचे उदघाटन चित्रकार वसंत सोनवणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पुरातत्व विभागाचे प्रमुख तेजस गर्गे,ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर पाटील,मुरलीधर रोकडे,बाळ नगरकर देविदास गोरे,उपस्थित होते.
मुंबईच्या जहाँगीर आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन ६ ते १२ फेब्रुवारी पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत खुले असून सर्वानी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन चित्रकार दीपक वर्मा यांनी केले आहे.
रेषा- रंगाची सळसळ सौंदर्य ”
दीपक वर्माचे शिक्षण मॅट्रीक नंतर नाशिक-पूना-मुंबई जी. डी. आर्ट पेंटिंग व डिप्लोमा इन आर्ट एज्यूकेशन पर्यंत झाले. घरातूनच कलेचे धडे मिळाले वडील उत्कृष्ट शिल्पकार – भाऊ चित्रकार यांच्या मार्गदर्शनातूनच…चित्रकला हीच भक्ती धारणा ठेवून, सातत्याने काम चालू ठेवून दीपक वर्मानी चित्रकलेसाठी आले आयुष्य समर्पित केले.
चित्रकार हा एक उत्तम निरिक्षक असतो. उत्तम चित्रकार होण्यासाठी निरिक्षण शक्ती असावीच लागते. सामान्य दृष्टीतून जर आपण आकाशाकडे पाहीले तर, नुसते ढग दिसतात, परंतु चित्रकाराच्या दृष्टीकोनातून पाहील्यास तेच ढंग वेगळे रूप- आकार धारण केलेले दिसतात. कोणतेही चित्रे रंगविण्या पूर्वी त्याचे रेखांकन (स्केच) करणे आवश्यक असते. स्केचिंग हा कलेचा मुलभूत पाया आहे. रेखाटनामुळे निरिक्षण शक्ती वाढते, नव-नव्या कल्पना चित्रात व मनात येऊ लागतात, सौंदर्यदृष्टी वाढते. चित्रात यथार्थदर्शन (Perspective) नियम बद्धता लक्षात येऊ लागते, चित्राची रचना कशी असावी, मांडणीत वेगवेगळे आकार एकमेकांत गुंतत गेल्याने, चित्रात सु-संवाद कसा निर्माण होतो, चित्रात आकर्षक बिंदु, लक्ष वेधण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, बिंदु व रचना स्थानाचा परिणाम चित्रे पाहिल्यावर काय होतो. ते कळते.असे वर्मा सांगतात
प्रत्येक चित्रात तरल सौंदर्य-सौंदर्यभूती जानवते.ती नुसत्या काळ्या पेनने असेल अथवा रंगाने असेल….. माध्यमाची, छाया-प्रकाशाची, भाव छटांची अथवा पोतांची (Texture) असेल. प्रत्येक चित्रात कला रसिकांना खिळवून ठेवण्याची ताकद असतेच असते. सर्व प्रकारचे विषय प्रा. दिपक वर्मा समर्थपणे व सफायदार पणे हाताळतांना दिसतात. तशी ही फार अवघड गोष्ट आहे, पण त्यांना ती लिलया साध्य झाली आहे.
आकार, कंम्पोज, कमी जास्त टोनल व्हॅल्यु, छाया-प्रकाशाचे सोपीकरण (simplification) याला दाद द्यायलाच हवी. चित्र विषय एक असला तरी प्रत्येक चित्रात नाविण्य आढळते . चित्रात एक विशिष्ट “इंट्रेस्ट” निर्माण केलेला दिसतो. चित्रावर सतत नजर फिरत राहून सुध्दा, एका विशिष्ट ठिकाणी दृष्टी खिळते. चित्रकारांनी नेहमी आपल्या कामात कार्यरत असायला हवे. ही एक प्रकारची तपश्चर्या आहे…
कले विषयी मनात सतत ओढ, सराव, निसर्गात बघण्याची किमया महत्वाची असते.चित्रातील रचना, तत्वाची जाण, रंग, रेषा, आकार, पोत प्रज्वलीत करते. चित्रांतील मर्म समजते. एकाच वेळी भावनेचा सहजाविष्कार व रेषेचे लयकारी अंग चित्रातून उत्कर्ष जाणवते. निसर्गचित्रे करतांना पाऊस पडल्या नंतर ओलं चिंब धुरकटलेला निसर्ग,
व्यक्त होणारी वातावरण निर्मिती-रंगसंगती, पाण्याच्या हालचाली, छाया-प्रकाशाचा अचुक योग्य वापर,धुक्यातून डोकावणारे उंच झाड, डोंगर, निसर्ग, ग्रामिण भाग, वाडे, घरे, ऐतीहासिक वास्तू, मंदिरे नव नवे कंम्पोज करून परिश्रम घेवून एकेक चित्रे साकारत गेलो. प्रत्येक चित्रात काही खास स्पर्श घेवून समूर्त झालेले असे वेधक ठरतात.एकाच वेळी समिक्षक, अभ्यासक, आस्वादक, रसिक व प्रेक्षक अशी सर्वांचीच पसंती मिळू लागते.
यशामागे फार मोठी मेहनत दडलेली असते. कल्पना सृष्टीत अगोदर पूर्ण उतरावयाचे, सहा बाजूंनी, दहा दिशांनी कमी-अधिक अंतरानी मनसोक्त दर्शन घ्यायचे, आपल्याला भावलेले आकार, विषयांर्गत बारिक सारिक घटकांचा विचार, चित्रातील स्थान, मांडणीतील पर्याय, चित्रातल्या रेषा-रंग अवकाशाच्या मनोहारी मिलापाने आपण थक्क होऊन जातो.त्यामळे प्रत्येक कला रसिकांनी हे चित्रप्रदर्शन बघावे
[…] व्यक्तिगत जीवन जन्म: १९ जुलै १९३८, […]