लोकसभा निवडणुकांची घोषणा:देशात ७ टप्यात मतदान :४ जूनला मतमोजणी

महाराष्ट्रात ५ टप्यात या तारखेला होणार मतदान

0

नवी दिली ,दि, १६ मार्च २०२४- संपूर्ण देशाला उत्कंठा लागून राहिलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली आहे. लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत देशात ७ टप्यात मतदान होणार असून ४ जूनला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात ५ टप्यात मतदान होणार आहे . १९ एप्रिल, २६ मे, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी मतदान होईल.निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यामुळे आज पासून संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली आहे.

टप्पा १:- १९ एप्रिल २०२४ (१०२ जागा)
टप्पा २:- २६ एप्रिल २०२४ (८९ जागा)
टप्पा ३:- ०७ मे २०२४ (९४ जागा)
टप्पा ४:- १३ मे २०२४ (९६ जागा)
टप्पा ५:- २० मे २०२४ (४९जागा)
टप्पा ६:- २५ मे २०२४ (५७ जागा)
टप्पा ७:- १ जून २०२४ (५७ जागा)
मतमोजणी :- ४ जून २०२४

महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुक

पहिला टप्पा –रामटेक, नागपूर, भंडारा, गरचिरोली, चंद्रपूर मतदान तारीख – 19 एप्रिल

दुसरा टप्पा –बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी
मतदान तारीख – 26 एप्रिल

तिसरा टप्पा – रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले मतदान तारीख – 7 मे

चौथा टप्पा –नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड मतदान तारीख – 13 मे

पाचवा टप्पा –धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, (मुंबईतल्या 6 जागा) मतदान तारीख – 20 मे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.