मुंबई, दि. ८ जून २०२५ – Maharashtra monsoon update राज्यात मान्सूनची वाटचाल रखडलेली असली तरी पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभाग (IMD) व स्कायमेट या खाजगी संस्थेच्या अंदाजानुसार, १२ ते १७ जूनदरम्यान महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जोरदार पावसाचे आगमन होऊ शकते.
हवामान विभागाच्या मते, बंगालच्या उपसागरात मान्सून प्रणाली तयार होत नसल्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला अडथळा येत आहे. मात्र, १२-१३ जूनपासून प्रणाली तयार होण्याची शक्यता असल्याचे
सांगण्यात आले आहे. काही हवामान मॉडेल्सने या प्रणालीच्या निर्मितीचा अंदाज वर्तवला आहे, तर काहींनी नाही, त्यामुळे अजूनही अनिश्चितता कायम आहे.
IMD चे निरीक्षण:(Maharashtra monsoon update)
१५ जूननंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार.
दक्षिण भारत, मध्य भारतात व्यापक ते अतिशय व्यापक पावसाची शक्यता.
पश्चिमेकडील वारे बळकट होत असून ऑफ-शोअर ट्रफ तयार होणार.
शेतकऱ्यांसाठी महत्वाचा काळ:
हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पेरणीसाठी योग्य वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. शेवटच्या आठवड्यात राज्यात चांगल्या पावसाची शक्यता असल्याने शेतीच्या दृष्टीने ही बातमी दिलासादायक आहे.
स्कायमेटचा अंदाज:
१० जूनपासून बंगालच्या उपसागरात पूर्वेकडील चक्राकार वारे तयार होणार.
११ जूनपासून हवामान बदल सक्रिय.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमार्गे दक्षिणेकडून पुढे सरकणार.
पुढील ३-४ दिवसांत:
मुंबईसह केरळ, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये वादळासह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्येही यलो अलर्ट देण्यात आला आहे. ईशान्य भारतातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.