मुंबई, १२ मे २०२५ –Maharashtra Rain News सध्या राज्यात काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी खरी प्रतीक्षा शेतकरी वर्गाला मान्सूनची आहे. महाराष्ट्रासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे –यंदा मान्सून वेळेआधी म्हणजेच ५ ते ७ जूनदरम्यान राज्यात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.
सामान्यतः केरळमध्ये १ जून रोजी मान्सूनची सुरुवात होते, पण यंदा तो १० दिवस आधी म्हणजेच १८ ते १९ मे दरम्यान केरळमध्ये दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून (Maharashtra Rain News) लवकरच दाखल होईल. अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनचे हालचाल सुरू झाली असून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
या लवकर येणाऱ्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांना लवकर पेरणी करता येणार असून, याचा सकारात्मक परिणाम उत्पादनावर होणार आहे. विशेष म्हणजे यंदा ‘ला नीना’ किंवा ‘एल निनो’चा फारसा परिणाम न दिसल्याने पावसाचे प्रमाण १०३ ते १०५ टक्के असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.
१३ मे पासूनच राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. परिणामी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
[…] […]