केंद्राच्या भक्कम पाठिंब्यावर आता महाराष्ट्राचा विकास  होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

नवी दिल्ली (निवेदिता मदाने-वैशंपायन) – राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची नेहमीच महत्वाची भूमिका असते. केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने  महाराष्ट्राचा आता सर्वतोपरी विकास  साधला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर होते. त्यांनी राष्ट्रपती सह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या.याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठीच या नव्या सरकारची स्थापन झाली आहे. हे सरकार राज्यातील  सर्व घटकांच्या हितांची जपणूक  करण्याकरिता सदैव कार्यरत राहील व यासाठी केंद्रशासनाच्या सहकार्याची नेहमीच आवश्यकता आहे. म्हणूनच सरकार स्थापनेनंतर शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती , प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यासह दिल्लीत आल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या  विकासाबाबतचा दृष्टीकोन  समजून घेऊन केंद्राच्या सहकार्याने राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांची मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट घेतली.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  शुक्रवारी  सायंकाळी दिल्लीत  दाखल झाले.  त्यांनी रात्री केंद्रीय  गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची  ६ ए, कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भेटी दरम्यान आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी प्रतिमात्मक विठ्ठल रखुमाई ची मूर्ती ही गृहमंत्री श्री.शहा यांना दिली. सकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची  तर  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   यांची  १७ अकबर रोड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांची  ७ लोक कल्याण मार्ग  या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

पत्रकार परिषदतील मुद्दे:
•मंत्रीमंडळ स्थापना विस्तार आषाढी एकादशी पंढरपूर विठ्ठल पूजेनंतरच
• आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानुसारच आमची शिवसेना आहे
•तेव्हा शिवधनुष्य चिन्ह आमच्याकडेच
• शिवसेना खासदार संपर्कात आहेत का?
तर प्रश्नाला बगल देत नकार दिला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.