आमदारांना मोफत घरे नाही : जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण

0

मुंबई – सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत ३०० घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केल्या नंतर सभागृहासह संपूर्ण राज्यात या निर्णयावर टीका करण्यात येत आहे. राज्यसरकारच्या या निर्णयावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झोपडपट्टी पुनर्विकास, बीडीडी चाळ, पत्रा चाळ यांचा उल्लेख करताना आमदारांसाठीही मुंबईत हक्काचे घर असणार असल्याचे सांगितले. सर्वसामान्य लोकांचं झाले, आता लोकप्रतिनीधींचं काय ?असा सवाल हि त्यांनी उपस्थित केला तर आपण जवळपास ३०० सर्वपक्षीय आमदारांसाठी मुंबईत घरे देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. या घोषणेचं सभागृहातील आमदारांनी बाक वाजवून स्वागत केले. मात्र,

मनसेसह अनेकानी या निर्णयाला विरोध केला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. आमदारांना मोफत घरे कशासाठी ? असा सवाल करत घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत वीज द्या आणि जनतेचे आशीर्वाद मिळवा, असं राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलतांना सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली.पाटील म्हणाले मी आणि सदाभाऊ खोत सोडलं तर अनेकांकडे दोन दोन तीन तीन घरे आहेत. त्यामुळे आमदारांना घरे देण्याची गरज नाही. कुणी आमदार होण्यासाठी नारळ दिला नव्हता. या लोकांना रोज डिप्लोमसी करावी लागत आहे. कशाला हवं घर? असा सवाल पाटील यांनी केला.

यावर आता गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्विटद्वारे हे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, ‘आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे. त्यामुळे या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!