नाशिक – नाशिक पासून जवळपास ९८ किलोमीटर दूर असलेल्या सुरगाणा तालुक्यातील अलंगुण ह्या गावी जोरदार अतिवृष्टी मुळे बंधारा फुटला. यामुळे पूर आल्यानंतर येथील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. गोरगरीब आदिवासी पाड्यांवरील शेकडो घरांमध्ये पाणी शिरून सर्वकाही वाहून गेले.
गेल्यावर्षी महाड येथील भीषण पूरस्थितीत तेथील ग्रामस्थांच्या मदतीला धावणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी याही वेळेस नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील अलंगुण गावी मदतीला सर्वप्रथम धावून गेले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकच्या वतीने जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या माध्यमातून गावकर्यांची आस्थेने विचारपूस करत आदिवासी बंधु-भगिनींना जीवनावश्यक साहित्य देत “मनसे’ मदतकार्य करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, पेठ तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, मध्य नाशिक विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, मनविसे नाशिक जिल्हा अध्यक्ष शाम गोहाड, मनविसे नाशिक शहराध्यक्ष संदेश जगताप, उमेश वाघ आदि पदाधिकाऱ्यांसह स्थानिक महाराष्ट्र सैनिक व नागरीक यावेळी उपस्थित होते.