शांतीगिरी महाराजांनी जाहीरनाम्यात मांडलं नाशिकचं व्हिजन

आमचं ठरलंय लढणार आणि जिंकणार

0

नाशिक,दि, ११ मे २०२४ –नाशिक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज आज लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि आपले नाशिक विषयीचे व्हिजन मांडले.श्रीरामांना वंदन करून आणि शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.हा फक्त माझा नाही,संपूर्ण जय बाबाजी भक्त परिवाराचा वचननामा आहे.असं हि ते म्हणाले  यावेळी शांतीगिरी महाराज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले नाशिकमध्ये भगवं वादळ आले आहे.निवडणुकीत वचननामा सादर करत आहे.लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा हा आमचा नारा आहे.जे बोलणार ते करणार,जे करणार तेच बोलणार असा आमचा संकल्प आहे.आम्हाला खात्री आहे की, राजकारणाच्या माध्यमातून जनतेचे ऋण आम्ही फेडणार आहोत.तसेच खासदार झाल्यावर पगार घेणार नाहीत.तो पगार जनसेवेसाठी वापरतील.असं हि ते म्हणाले

ते पुढे म्हणाले मी कुणाच्या नावाचा उल्लेख करणार नाही. जसे कर्म तसे फळ मिळणार आहे. कोणतेही काम चांगलं,टिकणारे काम झाले पाहिजे,टक्केवारी घेणार नाही.मोदींनी १० वर्षात चांगलं काम केले आहे.आम्ही निवडून आलो तर कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू.आमचं ठरलंय लढणार आणि जिंकणार,असेही त्यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले संसद भवन जसे आहे तसे खासदार भवन करणार आहोत. त्यात सगळे कक्ष असतील.जी समस्या तिथं येईल ती आम्ही सोडवू.आम्ही काही गोष्टी न बोलता करून दाखवू.आगळं वेगळं काम आम्ही करून दाखवू. गोदावरी नदी स्वच्छ करणार, स्नान करता आलं पाहिजे अशी गोदावरी नदी करणार आहोत.

तसेच आपल्या नाशिकमध्ये अंजनेरी गड येथे हनुमान जन्मभूमी साकारणार आहोत.अयोध्येप्रमाणे आम्ही विकास करणार आहोत. बेरोजगारी, सेंद्रिय खतांचा कारखाना उभारणार आहोत. नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन करणार आहोत.मेट्रो करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. पुणे, मुंबई या शहरांना जोडण्यासाठी भर असेल.आयटी पार्कसाठी प्रयत्न केले.पण,पूर्ण होऊ शकले नाही ते आम्ही पूर्ण करणार आहोत.

गुरुकुल पद्धतीचे शिक्षण सुरू केले जाईल,पैसे कमावण्याचा त्यात हेतू नाही.संस्कार त्या गुरुकुलमध्ये दिले जाईल.कुंभमेळ्यासाठी आम्ही चोख पद्धतीने नियोजन करू.नाशिक-पुणे रेल्वे सेवा सुरु करू.आमच्या गुरूंनी दिलेला उपदेश आहे. बोलून दाखवणार नाही करून दाखवणार आहोत.

जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे
कनेक्टिव्हिटी : शिक्षण, योग आणि संस्कृत विद्यापीठ उभारणार,तीर्थक्षेत्र विकास करणार,अध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, आदर्श कुंभमेळा व्हावा यासाठी प्रयत्न.

शेतकरी प्रथम प्राधान्य :मतदारसंघात शेतकरी विकास केंद्र उभारणार, मालाला हमीभाव, 24 तास वीज आणि पाणी सुविधा देणार.

नागरी सुविधा :अनेक प्रश्नांचा वेध घेण्यासाठी पुढील 25 वर्षांचा विचार करून आराखडा, वाहतूक कोंडी सोडवणार

उद्योग : नाशिकच्या तरुणांना शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही,आयटी पार्कचा पाठपुरावा करू, स्टार्ट अपसाठी प्रयत्न करणार

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.