नाशिक-मुंबई मार्गावर अवघ्या ३ किमी अंतरासाठी दुहेरी टोल;नागरिकांचा संताप
व्यापाऱ्यांची आंदोलनाची तयारी
नाशिक, दि. ९ जून २०२५ – Nashik Mumbai double toll नुकतेच इगतपुरी ते मुंबई समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले असले तरी,नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना अवघ्या ३-४ किमी अंतरासाठी दुहेरी टोल भरावा लागत असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घोटी टोल नाका आणि समृद्धी टोल यामध्ये फक्त ३-४ किमीचे अंतर असूनही दोन्हीकडे टोल आकारला जात असल्याने हे वाहनचालकांसाठी आर्थिक शोषण असल्याचे स्पष्ट मत नाशिक चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी मांडले.
📌 दुहेरी टोल दराचा तपशील:
घोटी टोल नाका (प्रवासी वाहन): ₹140
घोटी टोल नाका (मालवाहतूक): ₹500
समृद्धी महामार्ग (प्रवासी वाहन – ८० किमी): ₹200
समृद्धी महामार्ग (मालवाहतूक): ₹500+
🚗 नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या मुख्य मागण्या:(Nashik Mumbai double toll)
घोटी टोल नाक्यावरील ₹140 चा टोल कमी करून ₹25 करण्यात यावा.
समृद्धी महामार्गावरील घोटी–ठाणे दरम्यानचा टोल दर कमी करावा.
तत्काळ हस्तक्षेप करून वाहनचालकांवर होणारा आर्थिक अन्याय थांबवावा.
📣 प्रतिक्रिया आणि पुढील पावले:
चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.
जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर वाहनचालक संघटना आणि व्यापारी संघटना आंदोलनाचा मार्ग पत्करू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.
[…] नाशिक-मुंबई मार्गावर अवघ्या ३ किमी अं… […]