प्रभू राम उत्तमाचा ध्यास देतात -आचार्य श्रेयसजी बडवे यांचे प्रतिपादन

0

नाशिक,दि.७ ऑगस्ट २०२३-उत्तमाच्या सर्व संकल्पना रामाशी निगडित असून रामकथा जीवनातील थकवा घालवते. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर प्रभू रामचंद्र, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आपल्याला मार्गदर्शन करतात; त्यामुळे रामकथा श्रवण नित्य करावे असे प्रतिपादन आचार्य श्रेयसजी बडवे यांनी केले.

बळवंत स.देशपांडे, लक्ष्मण स.देशपांडे आणि उर्मिलाताई देशपांडे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ॲड.एस.एल.देशपांडे आयोजित रामकथा ज्ञानयज्ञात ते बोलत होते.रविवार दि.१३ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या रामकथेच्या पहिल्या दिवशी ॲड.उज्ज्वल देशपांडे यांच्या हस्ते पुस्तकेचे प्रकाशन करण्यात आले.

श्रीराम हे चारित्र्यवान महापुरुष म्हणून पूजिले जातात. त्यांच्याकडून जीवनाचरण शिकणे ही आजच्या काळाची गरज आहे. आज सर्वत्र असणारी परिस्थिती ही आचरणाच्या दृष्टीने लयाला गेलेली दिसते आणि म्हणून रामकथा श्रवण फार गरजेचे आहे. आचरणशील चरित्र हे प्रभू रामचंद्राचे, तर लीला चरित्र हे श्रीकृष्णाचे आहे. कृष्णचरित्राचे चिंतन आणि रामचरित्राचे आचरण ही आजच्या काळाची गरज आहे.

रामचंद्रांच्या चरित्राचा पुन्हा पुन्हा अभ्यास होणे, त्यावर चिंतन होणे आणि काळाच्या ओघात त्याचे नवे अर्थ प्रस्थापित करणे फार गरजेचे अगत्याचे आहे. ते काम नाशिक नगरीमध्ये झाले पाहिजे; कारण नाशिक हे भगवंताची भूमी आहे असे सांगून बडवे यांनी रामकथेतील वेगवेगळे प्रसंग सांगत कुश-लव भेटीच्या प्रसंगाचे हृद्य वर्णन केले. कथा श्रवणासाठी शहरातील मोठा श्रोत्रवर्ग उपस्थित होता.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!