चित्रकर्ती सुहास जोशी यांच्या “अमोदिनी” चित्रप्रदर्शनाचे उद्या उद्घाटन
महिलादिना निमित्य त्रिगुणात्मक शैलीच्या चित्रांतून होणार स्त्रीशक्तीचा जागर
नाशिक,दि,७ मार्च २०२४ – महिलांचे जीवनमान दर्शविणाऱ्या चित्रांसह अवकाशाची उत्पत्ती सांगणारा बिंदू, द्विमितीय अवकाशात ऊर्जा उत्पन्न करणारी रेषा आणि या अलौकिक ऊर्जेला नजकातीने सामावणारी परिपूर्ण रचना. अशा त्रिगुणात्मक कलाशैलीचा अनुभव देणारे चित्रकर्ती सुहास जोशी यांच्या अमोदिनी चित्रप्रदर्शनाचे उद्या(दि. ८ मार्च) सकाळी ११ वाजता तिडके कॉलनीतील इंडेक्स आर्ट गॅलरीत सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
महिला दिना निमित्य या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून उद्या ८ मार्च ते १७ मार्च सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत हे प्रदर्शन कलारसिकांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याची माहिती संयोजक स्नेहल तांबूलवाडीकर व रुचिर पंचाक्षरी यांनी दिली आहे.
चित्रकार म्हणून नाशिकमधून प्रवास सुरु करणाऱ्या सुहास जोशी यांची चित्रे ही भारतीय चित्र पद्धतीवर आधारीत आहेत.हे सर्व चित्र पाहण्याची संधी नाशिककर कलारसिकांना अनुभवाला मिळणार आहे.
चित्रकला क्षेत्रात पदार्पण कसे झाले या विषयावर बोलतांना चित्रकर्ती सुहास जोशी म्हणाल्या कि प्राथमिक शाळेत असतांना गुढीपाडवा आणि दसरा हे दोन दिवस शाळेत पाटीपूजन असायचं. पाटीवर सरस्वतीचं चित्र काढून नेताना बरोबर हळदकुंकु आणि साखरेची पुडी घेऊन जायची आणि शाळेत पाटीपूजन करुन घरी यायचे. त्यावेळी पाटीवर ओक या आकड्याची सरस्वती काढायला शिकले. ती मला खूप आवडायची. आजही तितकीच आवडते. इयत्ता ४थीत असताना राजा खी वर्मा त्यांच्या चित्रावरुन बघुन मी ती पाटीवर काढली. ती बधून वाड्यातला ४/५ मित्रमैत्रिणींनी त्यांच्या पाटीवरही तीच सरस्वती काढून घेण्यासाठी नंबर लावले. सगळ्यांच्या पाटीवर ती सरस्वती काढली. मला तेव्हा फार मजा आली ५ वीत मोठ्या शाळेत सारडामंदिरात प्रवेश झाला मला तो चित्रकलेचा वर्ग, चित्र रंगवायला शाळेतून मिळणारे रंग, वेगळे बाक या सगळ्याच खूप आकर्षण वारलं. आवडतं चित्र काढायला सांगितल्यावर मी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची लाल बस, तिला मागच्या बाजूने शिडी तिच्यावरची अक्षरं हे सगळं काही तपशीलासकट चित्रित करून ती रंगवली होती. बाईना ती खूप आवडली. तेव्हा शाळेत काचेची दारं असलेलं सॉफ्ट – बोर्डचं कपाट म्हणजे शोकेस असायची. त्यात इ. ५वी ते इ. १० वी अशी निवडक चित्र म्हणजे साधारण तीस ओक चित्र लागायची. त्यात माझी लाल अस्.टी. विराजमान झाली. मलावाटतं ‘ग्रुप शो’ मधे लागलेलं ते पहिलं चित्र.- मग आवड निर्माण झाली.
मेनरोडवर कलामहर्षी आदरणीय, वंदनीय श्री. वा. गो. कुलकर्णी यांचा स्टुडिओ अणि घर अकाच ठिकाणी होतं. त्यांच्याकडे दर रविवारी स्केचिंग क्लब ला जायला लागले. त्यांच्या कन्या शालिनी कुलकर्णी अर्क शालुमाई आणि वीणा गाडगीळ ह्या दोन कलाशिक्षिका आम्हाला लाभल्या चित्रकलेबरोबर आम्ही ५ वी पासून रांगोळी ही शिकलो. रांगोळी प्रदर्शन हे आमच्या शाळेचे खास वैशिष्ठ्य. हळूहळू स्थानिक, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत भाग घेमु लागले अर्थात्त चित्रकलेच्या बाईच्या प्रोत्साहनामुळेच. बक्षिसं, प्रशस्तीपत्रकं मिळत गेली तशी आवड आणि सुत्साह खूप वाढला. मग चित्रकलेची पहिली परिक्षा ‘ओलमिंटरी ग्रेड’ दिली. अभ्यासात बरी होते मग स्कॉलरशिपच्या परिक्षेला (इ. ७ वीत) बसायचे असे बाईच्या सांगण्यावरुन ठरले. मग चित्रकलेची दुसरी परिक्षा (इंटर- मिजिओट ग्रेड) नको असं वडिल म्हणाले. त्या दरम्यान शालुमाईनी माझ्यावर ओक जबाबदारी सोपवली
१ ऑगस्टच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांचे चित्र काढायचे, शेजारी त्यांच्याबद्दलची माहिती लिहायची. ओक फळा यासाठी नेमून दिला. मी खूप आनंदीत झाले. माझ्या कामाला सुखात केली. चित्र पूर्ण होत आले तेव्हा शाळेतले परांजपे सर (अण्णा) ज्यांना आम्ही सगळ्याच मुली घाबरायचो; ते मागे येऊन उभे राहिले. मला भीती वाटायला लागली. तेव्हा त्यांनी मला काम पूर्ण झाल्यावर ऑफिसमधे येऊन भेटायला सांगितले मग तर अजूनच भीती वाढली. त्यांना भेटायला गेले तेव्हा म्हणाले. “चित्र बरं काढलंय. अक्षरही चांगलं आहे. चित्रकलेच्या परिक्षा दिल्या का तुम्ही ? ” तेव्हा सांगितले वडिलांचं म्हणणं काय आहे ते. त्या क्षणी त्यांनी ड्रॉवरमधून कागद घेतला अणि चिठ्ठी लिहिली. घडी घालून कागद माझ्याकडे, वडिलांना देण्यासाठी दिला. मी बाहेर पडल्यावर अर्थातच पाकीटबंद कागद नसल्याने चिठ्ठी वाचली. परिक्षेला बसवण्यासंबधी तो ही संपूर्ण लाल अक्षरात मजकूर होता. तेव्हा लाल रंगाचे महत्त्व कळले मग मला खूप आनंद झाला. माझी शाळा, माझं रहाते घर या दोन्हीच्यामधे वडिलांचे ऑफिस होतं. शाळा सुटल्यावर मैत्रिणींबरोबर न रेंगाळता लगेच वडलांच्या ऑफिसमधे दाखल झाले. त्यांना चिठ्ठी दाखवली मग काय? मला घेऊन लगेच ते मेनरोडला बाईंना भेटले. नशीब की परिक्षेचे फॉर्मस् भरायला ४/४ दिवसांचा अवधी होता. क्लास मात्र जूनमधे सुरु झालेला होता. पण माझा अशीरा का होईना क्लास सुरु झाला:’बी’ ग्रेड मिळाली. शाळेत असैपर्यंत चित्रकला चालूच होती. १० वी नंतर काय करायचे? मला १० वीत ७४ टक्के मार्क होते. तेव्हा ७६ साली ते चांगले समजले जायचे. मी सोडून संबंधित लोकांचे मत मी सायन्सला प्रवेश घ्याग हेच होतं. पण चित्रकलाच खूप आवडत होती त्यामुळे आई माझ्या पाठीशी ‘तुला हवं ते शीक. पण त्यात उत्तम मेहनत करुन चांगलं करुन दाखवः’ ह्या अनमोल सल्ल्यानिशी भक्कमपणे अभी राहिली. लोकांचा विचार न करण्याबद्दलही सांगितले. मला वाटतं स्वतःचा विषय नसतोना विद्यार्थ्यांमधले कलागुण हेरुन अधिकारवाणीने सल्ला देणारे परांजपे सर आणि माझी आई ह्या दोघांमुळे माझे चित्रकला क्षेत्रात पदार्पण झाले.असं सुहास जोशी सांगतात