कवी -गीतकार प्रकाश होळकर यांना ‘दु:खी ‘राज्यकाव्य पुरस्कार पुरस्कार जाहीर

0

जालना ,दि,२४ मार्च २०२५ – येथील स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने  सुप्रसिद्ध उर्दू शायर कै. राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा  ‘ दु:खी ‘ राज्यकाव्य पुरस्कार नाशिक येथील कवी-गीतकार  प्रकाश होळकर यांना जाहीर  झाला आहे .

पुरस्काराचे यंदा २७ वे वर्ष असून २५ हजार रुपये रोख , स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच ना. धों. महानोर राज्य पुरस्कार कोल्हापूर येथील साहित्यिक रफीक सूरज यांना घोषित झाला आहे.१० हजार रुपये रोख , स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून येत्या गुढीपाडव्यास जालना येथे रविवारी ( ता.३० मार्च ) सायं.७.०० वा. ‘ कवितेचा पाडवा ‘ या गाजलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

शनिवारी ( ता. २२ ) संयोजक अभय साहनी, विनीत साहनी, लेखिका- कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर, अनुभव प्रतिष्ठानचे सचिव  पंडितराव तडेगावकर यांनी पुरस्काराची घोषणा केली.पुरस्कार वितरणानंतर निमंत्रित कवींची सुरेल काव्यमैफल रंगणार आहे.तसेच कार्यक्रम स्थळी चित्रप्रदर्शन असणार आहे.तरी रसिकांनी   गौरवशाली साहित्यिक उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.

विपूल साहित्य संपदा…! 
पुरस्कार प्राप्त कवी- गीतकार प्रकाश होळकर यांनी कोरडे नक्षत्र,  रानगंधाचे गारुड, या साहित्य कृतींसोबतच सर्जाराजा, टिंग्या, गोष्ट छोटी डोंगराएवढी, बाबू बँडबाजा, धूळमाती, टपाल, घाटी अशा तेरा  चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केले आहे. साहित्यिक समीक्षक  रफीक सुरज यांची रहबर कादंबरी, आभाळ,  बेबस,पायाड हे कथासंग्रह, तसेच  कवितासंग्रह ,समीक्षाग्रंथांसह मुस्लिम लेखकांच्या मराठी ग्रंथसूची आदींचे लेखन केले आहे. 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!