राजसाहेब,अमित साहेब,आपणच नाशिकच्या मैदानात उतरा :कार्यकर्त्याची पत्राद्वारे गळ 

0

नाशिक ,दि,२३ मार्च २०२४ –लोकसभा निवणुकीत मनसे महायुती बरोबर जाणार हे नक्की झाले असून भाजपा कडे ३ जागा मागितल्या आहे,दक्षिण मुंबई,शिर्डी आणि मनसेचा बालेकिल्ला असलेले नाशिक या तीन जागा मनसेला मिळाव्या अशी मागणी करण्यात आली होती.नाशिक लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराविषयी दररोज नव्या घडामोडी समोर येत आहेत, आता चक्क मनसेप्रमुख राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचे नाव चर्चेत आले आहे.मनसैनिकांनीच राज ठाकरे यांना नाशिक लोकसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी पत्राद्वारे गळ घातली आहे.त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीसाठी आणखी एक नाव पुढे आले आहे.उमेदवारीवरून राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मतदारसंघांमध्ये नाशिकचे नाव घेतले जात आहे. कारण या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीकडून अद्यापपर्यंत एकाही उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेलेले नाही. त्यामुळे स्वतः राज ठाकरे किंवा अमित ठाकरे यांनी निवडणुक लढवावी अशी कार्यकर्त्यांनि पत्राद्वारे मागणी केली आहे.

पत्रात म्हटले आहे की,मनसेच्या स्थापनेनंतर नाशिकमधून १२ नगरसवेक निवडून आले होते.दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये नाशिक शहरात ४० नगरसेवक,तीन जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचायत समिती सदस्य व ग्रामीण भागात १५ नगरसेवक अशी मनसेची विजयी घोडदौड झाली होती. त्यावेळी लाेकसभेचे मनसेचे नवखे उमेदवार हेमंत गोडसे यांचा निसटता पराभव झाला होता. पक्षाची पुढील वाटचाल जोमाने झाली. नाशिक नगरीत मनसेचा महापौर झाला असता, तत्कालीन राज्य सरकारकडून निधी मिळणे दुरापास्त झाले होते. अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या. पाच वर्षांत तीन वर्षे आयुक्त नव्हते, तरीसुद्धा राज ठाकरेंनी विविध विकासकामे केल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे.

मनोज घोडके,अमित गांगुर्डे, निखिल सरपोतदार, संदीप भवर, किरण क्षीरसागर, संदीप जगझाप, रोहन जगताप, विजय ठाकरे, संजय देवरे, नितीन धानापुणे, महेंद्र डहाळे आदी मनसैनिकांनी लवकरच राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना नाशिकच्या जागेसाठी आग्रह करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. …तर अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी मनसेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. मनसेची पालिकेतील सत्ता गेल्यानंतर शहरातील रस्त्यांची वाट लागली असून, जनता हैराण झाली आहे. हा राग मतदान यंत्रातून व्यक्त होईलच. त्यामुळे नाशिकमधून खुद्द राज ठाकरे किंवा अमित ठाकरे यांनीच निवडणूक लढवावी व नाशिकसह महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व दिल्लीत करावे,अशी इच्छा पत्राद्वारे मनसैनिकांनी व्यक्त केली.

काय लिहिलं आहे पत्रात

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.