नाशिक,२९ ऑगस्ट २०२२ – कोरोनाच्या काळामध्ये डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यास परिपूर्ण झालेला नसल्याने शासनाने स्पष्ट्र करत विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.यामुळे डिप्लोमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला होता. तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यसारखाचीच डिप्लोमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील नापास झालेल्या विद्यार्थाचीही पुन्हा परिक्षा घ्यावी यासाठी खा.गोडसे यांनी आज उच्च व शिक्षण विभाग प्रशासनाची भेट घेत विद्यार्थ्याच्या व्यथा मांडल्या.राज्यभरातील विद्यार्थ्याकडून येत असलेल्या तक्रारीची दखल घेत आजच डिप्लोमाच्या प्रथम आणि दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा पारिक्षा घेण्यात येणार असल्याचा आदेश काढल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव तिडके यांनी खा.गोडसे यांना दिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झालेला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालय बंद होती.या दरम्यानच्या काळामध्ये कॉलेजकडून विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रमाचे धडे शिकवले जात होते.विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाइन पद्धतीने चांगला न झाल्याचा नसल्याचा निष्कर्ष काढत शासनाने डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचे आदेश काढले होते.यामुळे डिप्लोमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रम करत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संताप वजा नाराजीचा सूर होता.दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील डिप्लोमा कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनी खा.गोडसे यांची भेट घेत फक्त तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचीच नव्हे तर पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाचा अभ्यासक्रम परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचीही पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी आग्रही मागणी करत होते.
विद्यार्थ्यांच्या व्यथा लक्षात घेतून गेल्या काही दिवसांपासून खा.गोडसे सतत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रशासनाच्या संपर्कात होते.विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात नापास झालेल्या विद्यार्थ्यांचीही पुन्हा परीक्षा घेण्यात याव्यात यासाठी प्रयत्नशिल होते.आज संगमनेर येथील अमृतवाहिनी पॉलिटेक्निकल कॉलेजच्या विद्यार्थी युनियनचे अध्यक्ष आदित्य चकणे आणि खा. हेमंत गोडसे यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव तिडके यांची भेट घेतली.यावेळी तिडके यांनी शासनाने आजच काढलेल्या आदेशाची प्रत खा.गोडसे यांच्या समोर ठेवत राज्यभरातून विद्याथ्र्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या तक्रारीची दखल घेत आजच डिप्लोमाच्या प्रथम आणि दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा पारिक्षा घेण्याचे आदेश काढल्याची माहिती दिली.शासनाच्या या निर्णयाचा फायदा राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.