सुरक्षिततेच्या कारणास्तव पुढील काही दिवस मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद

0

मुंबई,२५ ऑगस्ट २०२२ – देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या गेट वे ऑफ इंडिया सुरक्षतेच्या कारणास्तव पुढचे काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.परराज्यातील किंवा परदेशातून जे पर्यटक मुंबई पाहायला येतात त्यांची पावलं हमखास गेट वे ऑफ इंडियाकडे वळतात मात्र आता पुढील सूचना मिळेपर्यंत गेटवे ऑफ इंडिया बंद राहिल.एबीपी माझा या वृत्तवाहिनेने याबाबत हे वृत्त दिले आहे.

काही दिवसापूर्वी मुंबईपासून जवळपास २०० किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर माय लेडी हान नावाची संशयास्पद बोट सापडली होती. या बोटीची तपासणी केली असता त्यात तीन AK-47 रायफल आणि अनेक राऊंड्स गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. ही संशयास्पद सापडल्यानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर मागील आठवड्यात एक संशयास्पद बोट सापडली होती, ज्यावर तीन एके-47 रायफल आणि काडतुसं सापडली होती. यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात दहशतवादाचा कोणताही पैलू नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. दहीहंडीचे कार्यक्रम आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर बोटीवर शस्त्रं सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!