शहर परिसरातील मुंबई – आग्रा महामार्ग होणार प्रकाशमय

राज्यमार्ग प्राधिकरणाकडून नऊ कोटींचा निधी मंजूर : खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांना यश

0

नाशिक,७ सप्टेंबर,२०२२ –  नाशिक शहरासह परिसरातील महामार्गावरील अपघातांचे आणि अंधारातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग प्रकाशमय व्हावेत यासाठी खा. हेमंत गोडसे यांच्याकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने नाशिक शहरासह वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल प्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिसरोड प्रकाशमय करण्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली असून विजेचे ९२४ पोल उभारण्यात येणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे आता महामार्ग प्रकाशमय होणार असून रात्रीच्या अंधारात हकनाक होणारे अपघात टळणार असल्याचा विश्वास खा.हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक शहर परिसरातील आणि नाशिक – आग्रा महामार्गावर विजेचे पोल फारच कमी व सतत बंद स्थितीत असल्याने असल्याने महामार्गावर कायमच लहान, मोठे अपघात होत असतात. पावसाळ्यात अपघातांच्या प्रमाणात मोठया प्रमाणावर वाढ होत असते. या अपघातामुळे काहींनी जीव गमवीलेला असून अनेकांच्या वाटयाला कायमचेच अपंगत्व आलेले आहे. अंधाराचा फायदा घेत लुटारूंकडून रस्त्यावरील प्रवाशांना लुटल्याच्या अनेक घटना घडतच असतात. हि विदारक परिस्थिती टाळण्यासाठी महामार्गावर प्रखर उजेड घेणाऱ्या एलईडी असावेत यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खा. गोडसे प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे.

केंद्राच्या भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने नाशिक शहर परिसरातील मुंबई-आग्रा महामार्ग तसेच वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल फ्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिसरोडवर विजेचे पथदिपे बसविण्यासाठी आणि त्याच्या देखभाल करण्यासाठी ८ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे .नाशिक शहर परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गाच्या 40 किलोमीटर अंतरावर दोनही बाजूच्या सर्व्हिसरोडसह पाचशे चौरेचाळीस, वणी

जंक्शन ते पिंपळगाव टोल या दरम्यानच्या दहा किलोमीटरच्या अंतरावर ३२२ तर कोकणगाव शिवारातील सुमारे पावणे दोन किलोमीटर अंतरावर ५८ प्रखर उजेड देणारे एलईडी पथदिपे नव्याने बसविण्यात येणार असून या निधीतूनच देखभालही करण्यात येणार आहे वरील निधीतून एकून पन्नास किलोमीटर अंतरात नऊशे चोवीस विजेचे पोल उभारण्यात येणार आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या विजेच्या पोलमुळे शहर आणि परिसरातील महामार्ग प्रकाशमय होणार असून अपघातांचे प्रमाण अत्यल्प होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!