तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’माझ्याकडे : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

0

मुंबई,दि. २४ ऑक्टोबर २०२३ – यंदा खोकासूराचे दहन करणार आहोत.ज्याप्रमाणे हनुमानाने सोन्याची लंका दहन केली.तशी तुमची खोक्याची लंका दहन करणारा धगधगती मशाल माझ्याकडे आहे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.शिवसेनेचा (ठाकरे गट) दसरा मेळावा आज शिवाजी पार्कवर झाला. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते

दसरा मेळाव्याला ५७ वर्ष झाली ही पंरपरा थांबू दिली नाही.मोडता घालण्याचा प्रयत्न झाला. पण मोडता मोडित काढून परंपरा कायम ठेवली आहे.असं ही उद्धव ठाकरे म्हणाले ते पुढे म्हणाले प्रभू श्री रामचंद्रांनी धनुष्यबाणाने रावणाचा वध केला. भानगड नको म्हणून यांनी धनुष्यबाण देखील चोरला आहे. खोक्याची लंका दहन करणाऱ्या धगधगत्या मशाली माझ्या सोबत आहेत. सध्या क्रिकेटचा मौसम सुरु आहे. तिकडे ३ हिरो जाहिराती करत आहेत.  हे कमला पसंद वाले अशी जाहिरात करतात. तर आमच्याकडे कमळा पसंद वाले आहेत. पसंद अपनी अपनी अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारवर निशाणा साधला.

Uddhav Thackeray Speech/Shiv Sena Dussehra Gathering/Shivatirtha/

जातीमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मराठा आंदोलक मनोज जरांगे  यांचे अभिनंदन उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात केले. मराठा आरक्षणाची मागणी मान्य करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनात विशेष कायदा का केला नाही असा सवालही उद्धव ठाकरे यांनी  केला. मनोज जरांगे पाटील यांनी  आज धनगर समाजाला साद घातली, ही चांगली गोष्ट. अंतरवली सराटी येथे आंदोलकांवर अत्याचार झाले, हे जनरल डायरचे सरकार आहे. मी मुख्यमंत्री असतानाही हा प्रश्न होता, पण आम्ही लाठीमारचा आदेश दिला नव्हता. जालन्याचा डायर कोण, याची चौकशी का नाही झाली. हा विषय लोकसभेत सोडवावा लागेल. सर्वांना न्याय देणारा निर्णय संसदेत व्हावा. असे हि उद्धव ठाकरे म्हणाले

मुंबई-महाराष्ट्र बकाल करण्याचा डाव आहे, मला ते मोडून काढायचे आहे. मुंबई तोडता येत नाही म्हणून मुंबईची स्वायत्ता मारली जात आहे. सगळी महत्त्वाची केंद्र मुंबई बाहेर नेले जात आहेत. कोरोना काळातील घोटाळ्याची चौकशीच करायची असेल, पीएम केअर फंड पासून सगळ्या राज्यांची चौकशी करा.आम्ही मुंबई वाचवली,पण मुंबईची बदनामी केले जात आहे.तुम्ही रिकाम्या थाळ्या बडवत होता, आणि आम्ही गोरगरिबांना पाच रुपयात जेवण दिले.

राज्यात दुष्काळीस्थिती आहे,टँकर सुरू झाले आहेत.पण पीक विमा कंपन्यांनी आग्रीम देऊ केलेली नाही.शिवसैनिकानी शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहावे विमा कंपन्यांना जाब विचारा असा आदेश मी देत आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले भगव्याशी गद्दारी करणारा या मातीत ठेवायचा नाही.असे ही ठाकरे म्हणाले

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!