नाशिक – जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे.आ पावसाने उघडीप घेतली आहे.त्यामुळे गंगापूर धरणातून केला जाणार विसर्ग थांबवण्यात आलेला आहे. गंगापूर धरणातून तब्बल १५ दिवसांपासून विसर्ग सुरूच होता. पण आता काही प्रमाणात पावसाने हुलकावणी दिली आहे. पाणी साठ्याची गरज लक्षात घेता हा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जुलै महिन्यात खूप जास्त होते. जिल्ह्यात यंदा पावसाचा ८१ वर्षाचा रेकॉर्ड मोडला गेला आहे. सन १९४९ साली जुलै महिन्यात ५४९.५ मिलिमीटर पाऊस झाला होता. मात्र यंदा ५५०.६ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. म्हणजे यंदा पावसाने नाशिक जिल्ह्यात तब्बल ८१ वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. यंदा पावसाची अशी परिस्थिती होती. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार होती. त्यामुळे जुलै महिन्यातच गंगापूर धरण ६५ टक्के भरले होते त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला होता. जिल्ह्यातील पाणीसाठा देखील जवळपास ८० टक्क्यांच्या वर जमा झाले आहे.
संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरण १०० टक्क्यांवर आहेत. तर उर्वरित धरणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या पावसाने तब्बल ८१ वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. नाशिक जिल्हामध्ये जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्हावासियांची पाण्याची चिंता वाढवली होती. जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ घाटला होता. त्यामुळे पाणी कपातीचे मोठं संकट नाशिककरांसमोर उभं ठाकलं होतं. मात्र, या पाणी संकटाला अवघ्या २५ दिवसात झालेल्या पावसानं दूर केले आहे. जुलै महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने धरण ओव्हर फ्लो झाली आहेत आणि नाशिक शहरात जुलै महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरणाची ताई स्थिती
Dam Position Dt. 28.07.2022 (1)