श्रीवर्धन किनाऱ्यावर शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळल्याने एकच खळबळ

0

रायगड – रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बोटीमध्ये दोन ते तीन एके-47 आढळले आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे.गंभीर बाब म्हणजे बोटीत काही शस्त्रास्त्रांचा साठादेखील सापडला. समुद्रामार्गे दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याची शक्यता पाहता, रायगड जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला.

काही स्थानिकांना सकाळी ८ वाजेच्या सुमारास बोट समुद्रात अडकल्याचे दिसून आले. काही स्थानिकांनी या बोटीत काय आहे, याची पाहणी केली.त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या. त्याशिवाय २२५ राउंड्स गोळ्या आढळून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर, भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आल्यात. या प्रकरणी कोणतीही व्यक्ती आढळली नाही.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे. तर, दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेल्या किनाऱ्यावर संशयास्पद बोट शस्त्रांसह आढळून आल्याने गंभीर बाब समजली जात आहे.

रायगडमधील श्रीवर्धनमधील हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेल्या संशयास्पद बोटीनंतर राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सागरी किनाऱ्यावरील पालघर, रत्नागिरी किनाऱ्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर, मुंबई, पुण्यात नाकेबंदी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

विधानसभेत आमदार आदिती तटकरे यांनी हा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्याची विनंती केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुरक्षा यंत्रणांना सखोल चौकशीचे आदेश दिले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!