नवी दिल्ली – राष्ट्रपती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (NDA) द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे.मतमोजणी आधीच द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात होता.भाजपने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना विजय मिळावा यासाठी प्रचंड मोर्चोबाधणी केलेली होती.
राष्ट्रपतिपदासाठी १८ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी झाली.त्यामध्ये द्रौपदी मुर्मू या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात लढत होती. द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत ७१९ खासदारांसह देशभरातील ४ हजारांहून अधिक आमदारांनी मतदान केले होते. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या २४ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत.द्रौपदी मुर्मू विजयानंतर आता २५ जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.
द्रोपदी मुर्मू यांना पहिल्या फेरीत ५४० खासदारांची मतं मिळाली. तर यशवंत सिन्हा यांना २०८ खासदारांची मतं मिळाली. द्रोपदी यांना पहिल्या फेरीत मिळालेल्या मतांचं मूल्य ३ लाख ७८ हजार तर यशवंत सिन्हा यांना मिळालेल्या मतांचं मूल्य १ लाख ४५ हजार इतकं होतं. या दरम्यान पहिल्या फेरीत १५ मतं रद्द झाली.
द्रौपदी मुर्मू यांना दुसऱ्या फेरीतील मतमोजणीतही घवघवीश मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या दहा राज्यांची मतमोजणी करण्यात आली. या फेरीत एकूण १८८६ मतं वैद ठरली. त्यापैकी द्रोपदी मुर्मू यांना १३४९ मतदान झालं. त्या मताचं मूल्य ४८३२९९ इतकं आहे. तर यशवंत सिन्हा यांना मतांची मुल्य ही १७९८७६ इतकं ठरलं.द्रौपदी मुर्मू या ओदिशा राज्यातील आहेत. झारखंड राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. झारखंडच्या राज्यपाल म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ मध्ये झाला. मुर्मू या ओदिशा जिल्ह्यातील मयुरभंज जिल्ह्यातील आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्त्व करतात. सरकारी कार्यालयात त्या लेखनिक मधून कार्यरत होत्या. मुर्मू यांनी मोफत अध्यापनाचं काम केलं त्यानंतर त्या राजकारणात आल्या. भाजपच्या आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू २००० आणि २००९ मध्ये विजयी झाल्या. भाजपमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी २०१३ ते २०१५ मध्ये काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू यांनी नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरु केली. रायरंगपूरच्या उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. भाजपमध्ये द्रौपदी मुर्मू यांनी विविध पदांवर काम केलं आहे.
#WATCH | Secretary General of Rajya Sabha and the Returning Officer for Presidential Election 2022, PC Mody hands over the certificate to President-elect #DroupadiMurmu at her residence in Delhi. pic.twitter.com/FMw58FCr6E
— ANI (@ANI) July 21, 2022