ISRO ला मोठे यश : पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत आदित्य L1 सूर्याकडे वाटचाल

0

श्रीहरीकोटा,दि.१९ सप्टेंबर २०२३ – आदित्य एल-१: सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली अंतराळ-आधारित मोहीम, आदित्य एल१ अंतराळयान, 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित झाल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेतून ‘निघाले’, असे इस्रोने म्हटले आहे. सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री पहाटे २ च्या सुमारास आदित्य-एल१ हे नियोजित प्रक्रियेनुसार पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाच्या पलीकडे गेले.

आदित्य L-1 आता पृथ्वी-सूर्य प्रणालीतील ‘लॅग्रॅन्गियन’ पॉइंट १ वर पोहोचण्यासाठी चार महिन्यांचा प्रवास सुरू केला आहे . एकदा का आदित्य-L1 ‘लॅग्रॅन्जियन’ बिंदूवर पोहोचले की, ते प्रभामंडल कक्षेत प्रवेश करेल आणि त्याच्या मिशनच्या कालावधीपर्यन्त ते तेथेच राहील.

इस्रोला सलग पाचव्यांदा मिळाले यश
देशाच्या अंतराळ संस्थेने म्हटले आहे की भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने एखादी वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तु किंवा अंतराळातील स्थानाकडे हस्तांतरित करण्याची ही सलग पाचवी वेळ आहे.

‘आदित्य एल-१’ ने डेटा गोळा करण्यास केली सुरुवात
याआधी सोमवारी, इस्रोने माहिती दिली की भारताच्या ‘आदित्य एल-1’ सूर्य मिशन स्पेसक्राफ्टने डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवती उपस्थित असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यात मदत होईल. इस्रोने सांगितले की, ‘भारतातील पहिल्या सौर वेधशाळेत बसवण्यात आलेल्या सेन्सर्सनी पृथ्वीपासून ५० हजार किलोमीटरहून अधिक अंतरावर असलेल्या आयन आणि इलेक्ट्रॉन्सचे मोजमाप सुरू केले आहे.’

नॅशनल स्पेस एजन्सीने X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘या डेटामुळे वैज्ञानिकांना पृथ्वीभोवती असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यात मदत होईल.’इस्रोने 2 सप्टेंबर रोजी पीएसएलव्ही-सी57 रॉकेटद्वारे ‘आदित्य-एल1’ प्रक्षेपित केले होते, जे पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर ‘लॅग्रॅन्गियन’ पॉइंट-1 (एल1) येथे हॅलो ऑर्बिटमध्ये ठेवले जाईल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!