मुंबई,दिनांक ,३० जून २०२५ – (Heavy Vehicle Transport Strike) महाराष्ट्रासह देशभरातील खासगी बस, शाळेच्या बस, एलपीजी वाहक, पाणी टँकर आणि कंटेनर वाहने चालवणारे चालक व मालकांनी १ जुलैच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या आंदोलनामुळे ३० हजार शाळांची वाहतूक, ३८ हजार कंटेनर वाहने आणि वारकऱ्यांची वारी यावर थेट परिणाम होणार आहे.संपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यायी वाहतुकीची तयारी ठेवावी. पालकांनी शालेय वाहतुकीसाठी आधीपासूनच खबरदारी घ्यावी.
📌 संपात सहभागी:(Heavy Vehicle Transport Strike)
मुंबईतील ३०,००० शाळांच्या बसेस
जेएनपीटी परिसरातील ३८,००० कंटेनर ट्रक
शालेय वाहतूक, खासगी प्रवासी बस
एलपीजी टँकर, पाणी टँकर चालक
आंतरराज्यीय कंटेनर संघटना
❗ मुख्य मागण्या काय आहेत?
ई-चलन (E-Challan) कारवाई त्वरित थांबवावी.
पूर्वी लावण्यात आलेले दंड माफ करावेत.
क्लिनर बंधनकारक करण्याचा निर्णय रद्द करावा.
🤝 संपाला कोणाचा पाठिंबा आहे?
ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस (दिल्ली)
बस अँड कार कॉन्फिडरेशन (दिल्ली)
महाराष्ट्र ट्रक टेम्पो टँकर बस महासंघ
महाराष्ट्र स्कूलबस संघटना
इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन, एलपीजी संघटना
⚠️ संपाचा संभाव्य फटका:
शालेय विद्यार्थी: नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे विद्यार्थी अडचणीत येणार.
वारकरी बांधव: आषाढी वारीसाठी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता.
उद्योग व लॉजिस्टिक क्षेत्र: कंटेनर व मालवाहतुकीवर परिणाम होणार.
🏛️ सरकारचा प्रतिसाद:
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे अखेर चक्का जाम आंदोलन जाहीर झाले आहे. शासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास संप अजून तीव्र होण्याची शक्यता आहे.