मुंबई,ठाणे,कल्याण,विरारमध्ये मुसळधार पाऊस;बारामतीत ढगफुटीसदृश पावसाने पूरस्थिती

मे महिन्यात एका दिवसात १३ इंच पाऊस –१०० वर्षातील विक्रम मोडला (व्हिडिओ पहा)

1

मुंबई | दिनांक: २६ मे २०२५ – IMD Rain Alert Maharashtra महाराष्ट्रात मान्सूनची अधिकृत एंट्री झाली असून राज्यभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, विरार परिसरात संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बारामती व इंदापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.बारामती विभागात मे महिन्यात एका दिवसात १३ इंच पाऊस झाला आहे १०० वर्षेनंतर अशा प्रकारचा पाऊस झाला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले

🌧️ मुंबईत पावसाचा तडाखा:लोकल सेवा विस्कळीत

रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू

अंबरनाथ-बदलापूरमध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस

रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल १५-२० मिनिटं उशिराने

कल्याण, कर्जतकडील वाहतूकही उशिराने

🌊 बारामतीत हाहाकार – कालवा फुटला, पूरस्थिती गंभीर IMD Rain Alert Maharashtra

मे महिन्यात एका दिवसात १३ इंच पाऊस – १०० वर्षातील विक्रम

नीरा कालवा फुटल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले

साईरंग, ऋषिकेश, श्री समर्थ या तीन इमारती पावसाने खचल्या

काटेवाडी व भवानीनगर मार्ग बंद, वाहनं वाहून गेली

शेती पाण्याखाली, अनेक कुटुंबं उघड्यावर

NDRFच्या दोन पथकांची तातडीने तैनाती

उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

🚨 चिपळूणमध्ये थरार :जीवघेण्या प्रसंगातून बचाव

तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर चिपळूण मधील पिंपळी सोनारवाडी येथील नदीपात्रात अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला यश आलं आहे. नदीमध्ये चढणीचे मासे पकडण्यासाठी तिघेजण गेले असता नदीपात्रात अडकले होते. नवर बायको आणि त्यांच्या सतरा वर्षाच्या पुतण्याला आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने दिले जीवदान. संतोष पवार त्याची पत्नी सुरेखा पवार आणि पुतण्या ओंकार पवार अशी बचावलेल्या तिघांची नावे आहेत. तिघेही चिपळूण मधील दळवटणे येथील रहिवाशी असल्याची माहिती.

चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचावकार्य यशस्वी

संतोष पवार, त्यांची पत्नी व पुतण्याला जीवदान

🌧️ IMD अलर्ट – सहा जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता
केरळ राज्यात मान्सूनने एन्ट्री केल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याकडून करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्रात कधी मान्सून येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मान्सून पूर्व पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे

अतिमुसळधार पाऊस: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

मुसळधार पाऊस: सातारा, कोल्हापूर

विदर्भ व मराठवाडा: सततच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान

🛑 प्रशासनाकडून सूचना
नागरिकांनी आवश्यक नसल्यास प्रवास टाळावा

धोका असलेल्या भागांतून स्थलांतर करावे

सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!