राज्यात मुसळधार पावसाची तीव्रता,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्रींचे प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश

0

मुंबई, २६ मे २०२५ – Maharashtra Heavy Rainfall News महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याचे आणि नागरिकांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश:
राज्यातील अतिवृष्टीमुळे पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे.

बारामतीत २५ घरांचे नुकसान, तर ७ नागरिकांना वाचवण्यात यश

इंदापुरात २ जणांचे पुरातून सुटका

फलटणमध्ये १६३.५ मिमी पावसाची नोंद, एनडीआरएफचा चमू कार्यरत

मुंबईत २४ तासांत १३५.४ मिमी पाऊस, १८ शॉर्टसर्किट, ६ ठिकाणी पाणी साचले, प्राणहानी नाही

मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन कक्ष व जलसंपदा विभागाशी समन्वय ठेवत बचावकार्य राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश:Maharashtra Heavy Rainfall News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर व रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून मदतकार्य २४ तास सुरु ठेवण्याचे निर्देश दिले.

पाण्याने भरलेले रस्ते, पुलांची स्थिती, वीज तारांवर लक्ष

धोकादायक इमारतींसाठी विशेष उपाय

उपनगरीय रेल्वे सुरळीत राहावी यासाठी दक्षता

नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना पाळाव्यात, अनावश्यक प्रवास टाळावा अशी सूचना करण्यात आली आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!