दहशतवाद्यांवर सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई:आदिल गुरी ,आसिफ शेख यांची घरे उडवली
नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने केला गोळीबार :भारतीय लष्कर हाय अलर्टवर
जम्मू काश्मीर ,दि,२५ एप्रिल २०२५ –जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने शोध मोहीम आधीक तीव्र केली आहे. या भ्याड हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. एनआयएने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने हल्ल्याचा आणि हल्लेखोरांचा कसून तपास सुरू केला आहे. पहलगाम हल्ल्यात दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरी यांची नावेही समोर आली आल्यानंतर पोलिस आसिफ आणि आदिलच्या घरी शोध मोहीम राबवण्यासाठी गेले होते. दरम्यान पोलिसांना संशयास्पद वाटले त्यानंतर लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर, ज्याला आदिल गुरी म्हणूनही ओळखले जाते, त्याचे घर उडवण्यात आली असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.
पाकिस्तान आपल्या कारवाया थांबवताना दिसत नाहीये. त्याने नियंत्रण रेषेच्या काही भागात गोळीबार केला. भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय लष्करही हाय अलर्टवर आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा ब्लॉकमधील गुरी गावातील रहिवासी आदिल गुरी हा पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचे मानले जाते. या हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह बहुतेक पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्याला मोस्ट वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे आणि अनंतनाग पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी कोणत्याही विशिष्ट माहितीसाठी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या प्रकरणात दोन पाकिस्तानी नागरिकांना मोस्ट वॉन्टेड घोषित करण्यात आले होते. आदिल २०१८ मध्ये बेकायदेशीरपणे पाकिस्तानला गेला होता, जिथे त्याने गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरला परतण्यापूर्वी दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचे वृत्त आहे.
#WATCH | Tral, J&K | Visuals of a destroyed house that is allegedly linked to a terrorist involved in the Pahalgam terror attack pic.twitter.com/luIH9rQIKR
— ANI (@ANI) April 25, 2025
दरम्यान, शुक्रवारी सकाळी बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी जिल्ह्यातील कुलनार अजस भागात शोध मोहीम सुरू केली होती, त्यानंतर चकमक सुरू झाली. त्याच्या घरात संशयास्पद वस्तूही आढळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर, ज्याला आदिल गुरी म्हणूनही ओळखले जाते, तो बिजबेहरा येथील गुरी येथील रहिवासी आहे, त्याचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. पहलगाम हल्ल्यात तो सहभागी असल्याचे मानले जाते. ज्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला होता, आदिल २०१८ मध्ये कायदेशीररित्या पाकिस्तानला गेला होता, तिथे त्याने गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरला परतण्यापूर्वी दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचे वृत्त आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. पोलिसही कसून तपास करत आहेत. सुरक्षा दलाचे कर्मचारी आदिल आणि आसिफ शेख यांच्या घरी शोध मोहिमेसाठी गेले होते. घरात स्फोटक पदार्थ असल्याचे पोलिसांनी सांगितले.