भेदरलेल्या पाकड्याचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न

भारतासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद:३० एप्रिल पर्यंत भारतीयांनी पाकिस्तान सोडावे 

0

नवी दिल्ली ,दि, २५ एप्रिल २०२५ – जम्मू काश्मीर मधील पेहलगाम झालेल्या दहशदवादी हल्ल्या नंतर भारताने पाकिस्तानवर भारताच्या कायदेशीर स्ट्राईक केली आहे. भारताच्या कायदेशीर स्ट्राईकनंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे.त्यानंतर पाकड्याने  देखील भारतावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानने म्हंटलं आहे. भारताने पाकिस्तान विरोधात घेतलेल्या ५ मोठ्या निर्णयांमुळे आता पाकड्याला धडकी भरली आहे.

सिंधु जल करार स्थगित केल्याचं भारताने जाहीर केल्यानंतर पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई करणं अशी डरपोक्ती पाकिस्तानकडून करण्यात आली आहे. काल  पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानने सर्व भारतीयांना ३० एप्रिलपर्यंत पाकिस्तान सोडण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत.भारताने बॉर्डर बंद केल्यानंतर आता पाकिस्तानने देखील वाघा बॉर्डर बंद केली आहे. पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी त्यांचं हवाई क्षेत्र बंद केलं आहे. भारतीयांना दिलेला व्हिसा देखील रद्द केलेला आहे. शिमला करार संपवण्याचा इशाराही पाकिस्तानकडून देण्यात आला आहे. द्विपक्षीय व्यापार देखील पाकिस्तानने बंद केला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!