
नाशिक : ढगफुटी व वसिष्ठी नदीला आलेल्या पूरामुळे कोकणातील चिपळूण, महाड, खेड, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी भयानक पुरस्थिती उद्भवली आहे. ढगफुटी मुळे खचलेल्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र सैनिकांना तातडीने पूरग्रस्तांची मदत करण्याचे आवाहन केले आहे.


