“लोकलचे दरवाजे बंद करण्यापेक्षा महाराष्ट्राचे दरवाजे बाहेरच्या लोंढ्यांसाठी बंद करा”–राज ठाकरे
(व्हिडीओ बघा )
मुंबई, दि. ९ जून २०२५ – Mumbai Local Train Accident दिवा ते मुंब्रा दरम्यान लोकल ट्रेनमधून ८ ते १२ प्रवासी खाली पडल्याच्या भीषण दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर आणि नियोजन व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून इतर अनेक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
⚠️ राज ठाकरे यांची प्रतिक्रिया:
“मुंबईत लोकलचे दरवाजे बंद करण्यापेक्षा बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे बंद करा,”
अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.
💬 ठळक मुद्दे:
मुंब्रा रेल्वे अपघातावर राज ठाकरे यांची तीव्र प्रतिक्रिया
“हे अपघात फक्त रेल्वे पुरते नाहीत, तर शहर नियोजनाचा अभाव आहे.”
“टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच आपल्याकडे नाही.”
“मोठे प्रकल्प आहेत पण वाहतूक आणि पार्किंगची वाट लागली आहे.”
“राज-उद्धव एकत्र येतील का हे विचारण्याऐवजी, रेल्वे अपघाताच्या बातम्या दाखवा.”
🚧 राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे:(Mumbai Local Train Accident)
वाढती गर्दी, वाढते अपघात हे बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळेच
रेल्वे, ट्राफिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली
मुंब्रा वळणाची धोकादायक स्थिती सर्वांना माहिती, तरीही उपाययोजना नाही
सरकार फक्त निवडणुका आणि प्रचारात गुंतले, सामान्यांचा विचार नाही
मेट्रो-मोनो आहे पण ते कोण वापरतंय हे पाहायला कोणी तयार नाही
वाहनांची नोंदणी थांबली नाही, तर वाहतूक संकट वाढतच जाणार
📰 राजकीय संदेश:
“मला विचारा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का हे विचारण्याऐवजी, लोकल अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या बातम्या प्राधान्याने लावा,” असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
आपल्या पोस्ट मध्ये काय म्हणाले राज ठाकरे
आज मुंबईत जो रेल्वे अपघात झाला तो दुर्दैवी आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, पण अशाच घटना रोज मुंबईत घडत आहेत. मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं-घेणं नाहीये.मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे. आम्ही सुद्धा ही मागणी केली होती, पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही.
आज शहरांचं नियोजन पूर्णपणे विस्कटलं आहे. प्रचंड लोंढे येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो बांधली जात आहेत. उंच उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे, पण पार्किंगचं काहीही नियोजन नाही.प्रत्येक शहरात ट्रॅफिकची गंभीर समस्या आहे. नवनवीन रस्ते, मेट्रो बांधून काहीही फरक पडत नाहीये, तरीही कुठलंच सरकार शहर नियोजनाचा किंवा बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचा विचार करत नाहीये.
आपलं सगळं लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचार यावरच केंद्रित आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती करणार का? या प्रश्नापेक्षा आज मुंबईत प्रवास कसा होतोय, शहरांमध्ये आणि एकूणच राज्यात लोकं कशा अवस्थेत जगत आहेत — हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत.माध्यमं हे प्रश्न उपस्थित करणार आहेत का? सरकारांना या प्रश्नांची उत्तरं मागणार आहेत का?कोणकोणाशी युती होणार, कोण काय म्हणाला, हे सगळं खरोखरच या गंभीर प्रश्नांपुढे क्षुल्लक आहे.
आपण लोकांच्या प्रश्नांकडे वळणार आहोत का?मी स्वतः मुंबईत रेल्वेने बराच काळ प्रवास केला आहे. पण तेव्हा परिस्थिती थोडी बरी होती. आता रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून धडकी भरते. हे खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात – तिथून काही शिकून येतात का?
परदेशात अशी घटना घडली असती, तर तिथे ती कशी हाताळली गेली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. इथे माणसाच्या जीवाला किंमतच नाही.
– मा. राज ठाकरे
[…] खळबळ माजवणारी घडामोड समोर आली आहे. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पुन्हा एकदा राजकीय वळण घेत […]