मोठ्या किंमतीत घर घेऊनही चांदशी परिसरात मूलभूत सुविधा नाही:नागरीक त्रस्त
पिण्याचे पाणी,पथदिप,रस्ते,ड्रेनेज व्यवस्था,घंटागाडी या सर्व मुलभूत सुविधांपासून रहिवासी अनेक वर्षे वंचित
नाशिक,दि.२८ जुलै २०२३ –गंगापूर रोड नंतर चांदशी परिसरात मोठया प्रमाणात विकास होणार होतो आहे.चांदशी परिसरात मोठमोठे प्रोजेक्ट उभारून बांधकाम व्यासायिकांनी घर जरी विकली असली तरी चंदशी परिसरातील नागरीकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने येथील रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
येथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून ,सांडपाण्याची व्यवस्था हि कोलमडली आहे.मोठया प्रोजेक्टच्या नावाखाली घरे विकल्यानंतर नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने येथील रहिवासी नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या संदर्भात विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे येथील रहिवाशांनी निवेदन दिले असून अद्यापही नागरिकांच्या समस्यांबाबत कोणतीही दखल घेतली गेल्या नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
काय म्हटलं आहे निवेदनात
महोदय,
आम्ही सर्व चांदशीकर,नाशिक मधिल रहिवासी असुन आम्हाला कोणत्याही प्रकारच्या मुलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. चांदशी परिसरात मोठया प्रमाणात लोकवस्ती असून देखील पिण्याचे पाणी, पथदिप, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, घंटागाडी या सर्व मुलभूत सुविधांपासून येथील रहिवासी अनेक वर्षे वंचित आहे. प्रचंड त्रास सोसत आहेत.अनेकदा ग्रामपंचायत / प्राधिकरण विभाग यांच्याकडे निवेदनं देऊनही, त्याची दखल घेतली गेली नाही.सर्वत्र घाण आणि दुर्गंधी पसरली आहे.सदोष रस्त्यांमुळे अपघात होत आहेत.वारंवार समस्यांबाबत तक्रार करुन देखील काही निष्पन्न होत नाही.
चांदशी वासी या सुविधांपासुन कायम वंचितच रहाणार का? चांदशी हा परिसर गंगापुर रोड ला लागुन आहे. दुस-या बाजुने बापु पुल परिसर आहे. हे दोन्ही विभाग नगर पालिकेच्या हद्दीत आहेत. असे असुन दोन्हिच्या मध्यभागी असलेले चांदशी मात्र अद्याप ग्रामीण मध्येच गणले जाते.तरी चांदशी विभाग नगरपालिकेत समाविष्ट करुन घ्यावा,अशी आम्ही सर्व चांदशीकर विनंती करतो. गंगापुर रोड येथुन सुयोजीत मार्गे चांदशीत येणा-या बापु पुला लगत नविन पुलाचे बांधकाम देखील स्थगीत करण्यात आले आहे, बापु पुल पाण्याखाली जातो तेव्हा चांदशीचा शहराशी संपर्क तुटतो. त्यामुळे त्याकडे लक्ष देऊन, पुलाचे बांधकाम लवकर सुरु करुन पुर्णत्वास न्यावे, हा विनंती. चांदशी वासीयांच्या समस्यांची दखल घ्यावी व आम्हाला न्याय मिळावा, अशी आम्ही समस्त चांदशीकर आपणांस कळकळीची विनंती करतो.