राज्यात पावसाचे संकट: हवामान विभागाचा इशारा

0

मुंबई, दि. ५ मे २०२५:Rain Alert in Maharashtra-राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले असून, हवामान विभागाने पुढील चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. राजस्थानच्या पूर्व भागात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ ते केरळपर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात हलक्यापासून ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विशेषतः पूर्व विदर्भात(Rain Alert in Maharashtra) चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना आणि हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक तापमानातही घसरण होणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

विदर्भात अवकाळी पावसाचा फटका:
गुरुवारी संध्याकाळी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची नोंद झाली. गोंदियात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने मका, भाजीपाला, धान आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यातील मोझरी परिसरात गारपिटीसह पाऊस झाला, ज्याचा थेट फटका शेतीला बसला आहे.

राज्यात पाणीटंचाईचा धोका नाही:
दरम्यान, राज्यात १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध असल्यामुळे पाणीटंचाईची शक्यता नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, ही स्थिती धरणांमधील साठ्याला पोषक ठरण्याची शक्यता आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!