दशक १५ समास सात अधोर्ध्व निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. या शरीराची त्या शरीराला वेदना एकमेकांना कळत नाही. हात पाय असे नाना अवयव असले तरी एका अवयवाची वेदना दुसऱ्याला कळत नाही तर मग दुसऱ्यांची वेदना कशी जाणणार? त्यामुळे दुसऱ्याची वेदना लक्षात येत नाही. एकाच पाण्यामुळे सगळे वनस्पती सगळ्या वनस्पती उगवतात मात्र अग्र उगवतात तेव्हा त्यातील भेद समजून येतो. खुडल्यावर ती सुकून जातात नाही तर ती टवटवीत असतात. याप्रमाणे भेद निर्माण होतो एकाचे दुसऱ्याला कळत नाही.
जाणीवरूपाने मात्र आत्म्याला भेद नाही. आत्मत्वामध्ये भेद दिसतो तो देह प्रकृतीमुळे भासतो. प्रत्येकाच्या ठायी दिसणारा वेगळेपणा हा देह स्वभावामुळे आहे, हे बहुतेकांना माहिती आहे. हे पाहून ऐकून सुद्धा लोक जाणतात. तरी शहाणे लोक अंतर्मनाची परीक्षा घेतात. धूर्त लोक मात्र गुप्तपणे ते सगळं जाणतात. जो अनेकांचे पालन करतो, तो अनेकांचे अंत:करण समजून घेतो. दूरस्थपणाने सगळं काही माहिती करून घेतो. आधी त्याचे मनोगत ऐकून घेतो. मग विश्वास निर्माण करतो.
अशा तऱ्हेने प्राणीमात्र वर्तन करतात. स्मरणानंतर विस्मरण होतं याची अनेक उदाहरण आहेत. आपण ठेवालेलं आपण विसरतो, आपल्यालाच आपलं आठवत नाही, काय बोललं ते आठवत नाही. मनामध्ये अनंत कल्पना उठतात त्या कशा ठाऊक होणार? असं हे चंचलचक्र काही नीट काही वक्र! एखादा रंक असला किंवा इंद्रदेव जरी असला तरी स्मरण केल्यानंतर विस्मरण होते, स्मरण म्हणजे देव विस्मरण म्हणजे दानव. स्मरण-विस्मरण असलेला असतो तो मानव. असेच वर्णन करतात म्हणून मानवी संपत्ती ही दैवी आणि दानवी अशी दोन प्रकारची असते. विवेकाद्वारे विवेक जाणावा. आत्म्याने आत्मा ओळखावा. डोळ्यांनी दर्पणात डोळा पहावा.
स्थूलांनी स्थूल खाजवावे, सूक्ष्माने सूक्ष्म समजावे. अंतर्यामी विचाराद्वारे विचार करावा. मनाद्वारे मन जाणावे, मन जाणून परलोक जाणावा. अंतरात्माच सर्वत्र आहे या स्मरणाचे विस्मरण होऊन मी तू इत्यादी भेद निर्माण होतो. हा भेद एकदेशी सापेक्ष असल्याने तो खरा नव्हे. पुढचं शिकतो मागचं विसरतो. पुढे उजेड मागे अंधार. पुढच आठवतं मागचं आठवत नाही. अशा प्रकारे स्मरण ही तुर्यावस्था आहे. सुषुप्ती म्हणजे विस्मरण आहे आणि शरीरामध्ये दोन्हीही गोष्टी असतात. असं समर्थ सांगत आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अधोर्ध्वनिरूपणनाम समास सप्तम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक १५ समास आठ सूक्ष्मजीव निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. अणु-रेणु आपण ज्याला म्हणतो त्यातील रेणूपेक्षाही सूक्ष्म असे किडे असतात त्याचं आयुष्य अगदी थोडं असतं. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये युक्ती बुद्धी देखील तितकीच असते. असे नाना जीव असतात ते पाहिल्यावर सुद्धा दिसत नाहीत. अंतकरण पंचकाची स्थिती तिथेही असते. त्यांच्यापुरतं त्यांचं ज्ञान असतं. विषय इंद्रिय समान असतात. त्यांची सूक्ष्म शरीर! त्यांचा कोण अभ्यास करतो? त्यामध्ये मुंगी ही महाथोर असते. या सूक्ष्म जीवामध्ये मुंगी हत्तीसारखी म्हणावी लागेल
त्यामुळे मुंगीला मुताचा पूर आला असं बोलतात! मुंगीसारखी लहान थोर शरीरे उदंड असतात. सगळ्यांमध्ये जीवरुपी ईश्वर वास्तव्य करतो. अशा किड्यांचा समुदाय त्याचा उदंड विस्तार गाठलेला असतो. जो विचारी माणूस असतो तोच त्याचा अभ्यास करतो. नाना नक्षत्र, नाना किडे त्याला पर्वताएवढे वाटतात आणि आयुष्यही त्याचमुळे उदंड वाटते. पक्षाइतकं लहान नाही पक्षाप्रमाणे मोठे नाही, सर्प आणि मासे या प्रकारचे जीव तुम्हाला दिसतात असं वर्णन समर्थ करीत आहेत. हा भाग येथे समाप्त झाला असून पुढील कथा पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

मोबाइल- ९४२०६९५१२७