मुंबई,दि,१० एप्रिल २०२५ –एसटी कर्मचाऱ्यांचा हिरमोड करणारी बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना (ST employees News)पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा वेतन फक्त ५६ टक्केच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नव्हे तर सुरक्षा रक्षकांना केवळ ५० टक्के पगार मिळणार आहे.त्यामुळे कारभाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी २७७ कोटींची आवश्यकता असते. पण राज्य सरकारने केवळ २७२ कोटीचा निधी महामंडळाला दिलाय. त्यापैकीही ४० कोटींचा निधी एसटी बँकेकडे वळवण्यात आलाय. आणि त्याचा थेट फटका कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांना निम्मा पगार देण्याची वेळ आली आहे.
या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पगाराच्या वेळोवेळी होणाऱ्या कपातीमुळे त्यांच्या रोजच्या गरजा भागवणंही कठीण झालं आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे.
[…] दिलासादायक बातमी आहे. २०२५-२६ पासून एसटीच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या २० […]