राहुल गांधींचा मोठा आरोप :“महाराष्ट्र विधानसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचं मॅच फिक्सिंग!”
भाजपाचं प्रत्युत्तर : राहुल गांधींना आत्मपरीक्षणाची गरज
नवी दिल्ली, दि. ७ जून २०२५ : Rahul Gandhi Latest News विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवर खळबळजनक आरोप करून देशभरात चर्चा निर्माण केली आहे. “ही निवडणूक म्हणजे औद्योगिक पातळीवर झालेलं मॅच फिक्सिंग असून, यामध्ये लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली झाली,” असं स्पष्ट म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
एका लेखातून राहुल गांधी यांनी पाच गंभीर मुद्द्यांद्वारे निवडणुकीतील कथित अनियमितता समोर मांडली आहे.
🔴 राहुल गांधी यांचे पाच आरोप :(Rahul Gandh iAllegation Maharashtra Assembly)
निवडणूक आयुक्तांची निवड ‘फिक्स’
२०२३ चा कायदा केंद्र सरकारच्या बाजूने आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे बहुमत देऊन निवडणूक आयोगाला बळी ठरवलं.
मतदार यादीतील बनावट भर
मे २०२४ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान ४१ लाख नवीन नावे नोंदवली गेली, जी आकडेवारीपेक्षा अधिक आहे.
मतदान टक्केवारीत ‘चमत्कार’
मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५८.२२% मतदर्शन नोंदले गेले, तेच आकडे सकाळी ६६.०५% झाले – म्हणजे तब्बल ७६ लाख मतांची अचानक भर.
निश्चित बुथांवर बनावट मतदानाचा प्रभाव
१२,००० बुथांवर भाजपची चमत्कारिक आघाडी, उदाहरण – कामठीमध्ये भाजपचं मत ५६ हजारांनी वाढलं, काँग्रेस स्थिर.
पुरावे लपवण्याचा आरोप
सीसीटीव्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगाचा नकार, नियमात बदल करून EPIC कार्डांची डुप्लिकेट ओळख लपवली गेली.
How to steal an election?
Maharashtra assembly elections in 2024 were a blueprint for rigging democracy.
My article shows how this happened, step by step:
Step 1: Rig the panel for appointing the Election Commission
Step 2: Add fake voters to the roll
Step 3: Inflate voter… pic.twitter.com/ntCwtPVXTu— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 7, 2025
🗣️ राहुल गांधींचा इशारा (Rahul Gandhi Latest News)
“ही निवडणूक एक प्रायोगिक प्रकल्प होती. आता हेच मॉडेल बिहार व इतर राज्यांत लागू होण्याची शक्यता आहे. सत्य समोर आणा, आणि प्रश्न विचारा,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
🔁 भाजपाचं प्रत्युत्तर : राहुल गांधींना आत्मपरीक्षणाची गरज
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींच्या आरोपांना जोरदार प्रतिउत्तर दिलं.
“पराभव पचवता न आल्यामुळे राहुल गांधी चुकीचे आरोप करत आहेत. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही ३.१७ कोटी मतं मिळवली, तर काँग्रेस २.१७ कोटींवर आली – त्यांची ३३ लाख मतं कमी झाली आहेत,” असं ते म्हणाले.
कामठी प्रकरणावर स्पष्टीकरण देताना, “आम्ही घरोघरी जाऊन नोंदणी केली. मतदार यादी दुरुस्त केली. मतवाढ सातत्याने होत असते. राहुल गांधी संभ्रमित आहेत,” असं बावनकुळे म्हणाले.
📌 सारांश :
राहुल गांधी यांनी केलेले आरोप हे भारतीय लोकशाहीसाठी गंभीर प्रश्न उपस्थित करतात, तर भाजपने जनतेच्या पाठिंब्याची ढाल पुढे केली आहे. यामागचं सत्य शोधून काढणं, हा लोकशाहीचा खरा विजय ठरेल.