जम्मू काश्मीर,दिनांक:२ मे २०२५ – Pahalgam terror attack 2025 :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएच्या तपासातून पाकिस्तानकडून रचलेल्या कटाचा पर्दाफाश झाला आहे.राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडून या हल्ल्याचा सखोल तपास सुरू असून, प्रारंभिक अहवालातून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार,या हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचा थेट हात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एनआयएने रिपोर्टमध्ये दोन मास्टरमाइंडचे नाव घेतले आहे. त्यात दहशतवादी हाशमी मूसा आणि अली भाई उर्फ तल्हा भाई याचा उल्लेख आहे. त्या दोघांचा पाकिस्तान कनेक्शनसोबत सविस्तर माहिती दिली आहे. हाशिम मूसा आणि तल्हा भाई हे पाकिस्तानचे नागरिक आहेत. हा हल्ला घडवण्यासाठी ते मागील अनेक दिवसांपासून हँडलरच्या संपर्कात होते. त्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून निर्देश दिले जात होते. आयएसआयच्या इशाऱ्यानंतर लष्करच्या मुख्यालयात पहलगाम हल्ल्याचा कट रचला गेला.
तपासातील मुख्य मुद्दे:(Pahalgam terror attack 2025)
हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचला गेला असून,
ISI च्या इशाऱ्यानंतर लष्करच्या मुख्यालयात याचे नियोजन झाले.
दोन पाकिस्तानी मास्टरमाइंड्स – हाशमी मूसा आणि अली भाई उर्फ तल्हा भाई यांची नावे पुढे आली असून, ते गेल्या अनेक आठवड्यांपासून पीओकेमधील हँडलर्सच्या संपर्कात होते.
दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात शस्त्रं लपवली होती, जे बैसरन खोऱ्यापासून १० किलोमीटर अंतरावर आहे.
OGW (Over Ground Workers) चा सहभाग निष्पन्न झाला असून,
एनआयएने त्यांच्या संपर्कातील लोकांची यादी तयार केली आहे.
3D मॅपिंग आणि हल्ल्याचा रिक्रिएशन रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
भारताची प्रतिक्रिया:
या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत सरकारने कठोर भूमिका घेत पाकिस्तानविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराला संपूर्ण कारवाईचे अधिकार दिल्याचे जाहीर केले आहे. आता सर्वांचे लक्ष आहे – पाकिस्तानवर कारवाई कधी आणि कशी होणार? याकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले आहेत दरम्यान अमेरिकेने हि भारताला समर्थन दिले आहे.