नाशिक– काल रात्री पासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असल्याने आज सकाळी ९ वाजता गंगापूर धरणातून २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर दुपारी १२ वाजता हा विसर्ग एक हजाराने वाढवून ३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गंगापूर धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण १०० टक्के भरले आहे. आज करण्यात आल्येल्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
असा आहे नाशिक जिल्ह्यातील धरणाचा पाणी साठा
[…] सतर्कतेचा इशारा 🙁Godavari Flood Nashik) गोदावरी नदीच्या काठच्या नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही […]