अल्टिमेटम संपला :मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु
सरकारने आमच्या दारात येऊ नये:गावात येणाऱ्या पुढाऱ्याला शांततेत गावा बाहेर काढा मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन
जालना,दि. २५ ऑक्टोबर २०२३ –मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला ४० दिवसांचा वेळ संपल्यामुळे आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारला २४ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती.यासोबत जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे राज्यातील मराठा समाजातील लोक आजपासून गावागावात साखळी उपोषण करणार आहेत.
माझ्या आमरण उपोषण सुरु झाल्यानंतर मी पाणी तसेच कोणतेही वैद्यकीय उपचार घेणार नसून हे उपोषण अत्यंत कडक करणार आहे.तसेच आरक्षणाचा जी आर घेऊन या नंतरच हे आमरण उपोषण मागे घेऊ
सरकारने आमच्या दारात येऊ नये गावात येणाऱ्या पुढाऱ्यांना शांततेत गावा बाहेर काढा,आत्महत्या करू नका माझ्या खांद्याला खांदा लावून साथ द्या असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले ते पुढे म्हणाले सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करत असून मराठा आरक्षण करण्याऱ्या आंदोलकांवर गुन्हे ही अद्याप मागे घेतले नाही.
माझ्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याने त्यांना मी ३० दिवसाच्या ऐवजी ४० दिवस दिले होते आता मराठा बांधवांना आरक्षण द्या आरक्षण मिळाल्या शिवाय मी मागे हटणार नाही असं ही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले मराठा बांधवानी शांततेत आंदोलन करावे ,असे आवाहन ही जरांगे पाटील यांनी केलं.
आत काहीतरी शिजतंय…
मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासूव कुणीतरी रोखतंय,असा दावा जरांने यांनी केला आहे.’अडचण असल्याशिवाय आणि मुख्यमंत्र्यांची तळमळ पाहता काहीतरी हाय.नाहीतर त्यांनी शपथ घेतली नसती. काहीतरी आत शिजतंय,त्यांनी ४० दिवस घेतलेच नसते. मी शब्द देऊन सांगतो काहीतरी आजत शिजतंय, हे १०० टक्के आहे.कुणीतरी आड येतंय.आम्ही जवळपास त्याचा शोध घेतलाय,थोडा वेळ थांबा,सगळं समोर येईल’,असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.