‘वेळ आली आहे एकत्र येण्याची’शिवसेना UBT ची हि पोस्ट चर्चेत

0

मुंबई,दि,२६,एप्रिल २०२५ –महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं होणारी एकमेव मागणी आता सत्यात उतरते कि काय असे वाटते आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र यावी असे अनेक मराठी माणसाचे स्वप्न आहे, मतदारांच्या मनातली गोष्ट म्हणजे शिवसेनेमध्ये पडलेली दरी मिटणं. अर्थात उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं एकत्र यावं असा सूर आजवर अनेकांनीच आळवला,खुद्द राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंदू मामा यांनी हि मागे एका चॅनल ला दिलेल्या मुलाखतीत राज आणि उद्धव एकत्र आले तर आनंदच होईल असे सांगितले होते. अधूनमधून तसे संकेतही मिळाले आहेत ते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत X हॅण्डल वरील पोस्ट वरून

आता मात्र या चर्चांना अनुसरूनच एक सोशल मीडिया पोस्ट करण्यात आल्यानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवसेना UBTच्या अधिकृत पेजवरुन करण्यात आलेल्या एका पोस्टमुळं या सर्वांच्या नजरा इथं खिळल्या आहेत.

पोस्ट मध्ये काय म्हंटले आहे .
“वेळ आली आहे एकत्र येण्याची,
मुंबई आणि महाराष्ट्रासाठी
शिवसैनिक तयार आहे,
मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी”

अशा आशयाची पोस्ट शिवसेना UBTच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज आणि उद्धव ठाकरेंनी दिलेले एकत्रीकरणाचे संकेत लवकरच प्रत्यक्षात उतरतील का ? आणि गेल्या अनेक वर्षांपासून असलेली प्रतीक्षा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याने पूर्ण होईल का? हाच सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

वरील शब्द आणि जनमानसाच्या गर्दीतून सर्वांचं अभिवादन स्वीकारणारे उद्धव ठाकरे या पोस्टमध्ये दिसत असून, आता हे शब्द नेमके काय सुचवू पाहत आहेत, याचाच तर्कवितर्क सध्या लावला जात आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!