भारताचा पाकिस्तानच्या लाहोर,कराची,रावळपिंडी,बहावलरपूरवर हल्ला
भारताचा प्रत्युत्तरात्मक हल्ला –पाकिस्तानचे दोन JF-17,एक F-16आणि अवाक्स विमान उद्ध्वस्त
नवी दिल्ली (दि. ९ मे २०२५) – India Strikes Back: पाकिस्तानने बुधवारी रात्री भारतातील अनेक राज्यांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी सर्व हल्ले निष्प्रभ केले आहेत. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला असून, लाहोरमध्ये पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीचा पूर्णपणे विध्वंस केला आहे.
🔻 भारताचा करारा जवाब – पाकिस्तानचे तीन महत्त्वाचे विमान पाडले
भारताने प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन JF-17 फायटर जेट, एक F-16 सुपरसोनिक विमान, आणि AWACS (अवाक्स) विमान उद्ध्वस्त केले आहे. अवाक्स हे रडार प्रणालीने सज्ज विशेष सैन्य विमान असून, युद्ध परिस्थितीत शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवते. हे विमान पाडणे म्हणजे पाकिस्तानच्या युद्धक्षमता आणि कमांड सिस्टीमवर मोठा आघात आहे.
🔺 लाहोर, कराची, सियालकोट आणि इस्लामाबादवर भारतीय कारवाई
भारताने लाहोरवर मिसाइल हल्ले करत पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमचा खात्मा केला आहे. लाहोरसह सियालकोट, कराची आणि इस्लामाबाद भागातही भारतीय लष्कराने तोफगोळ्यांची बरसात केली आहे.
🗣️ जयशंकर यांचा इशारा – “प्रत्येक हल्ल्याला उत्तर मिळेल”India Strikes Back:
भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्याशी चर्चा करून पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतीचा भारत सडेतोड प्रत्युत्तर देईल, असा इशारा दिला आहे.
🛑 जम्मू, पंजाब, राजस्थानमध्ये ब्लॅकआऊट आणि सायरन
ड्रोन व मिसाइलच्या हल्ल्यामुळे जम्मू-कश्मीर, पंजाब व राजस्थानमध्ये तात्काळ ब्लॅकआऊट करण्यात आला असून, सायरन वाजवण्यात आले. नागरिकांना घरात राहण्याचे व सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
🔰 जम्मूमध्ये ड्रोन हल्ला निष्फळ
भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने जम्मू एअरपोर्टजवळ आलेले अनेक ड्रोन निष्क्रीय केले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
[…] […]
[…] […]