राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला सशर्त परवानगी : १६ अटींचे करावे लागणार पालन 

राज ठाकरेंच्या सभेसाठी 'या'आहेत १६ अटी  

0

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अटी-शर्तींसह परवानगी मिळाली आहे, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी  दिली आहे. राज ठाकरे यांची १ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला पोलिसांनी सुरुवातीला परवानगी दिली नव्हती. पण मनसे नेते बाळा नांदगावकर आणि इतर प्रमुख नेते औरंगाबादला गेले होते.अखेर आज या सभेला पोलीस प्रशासनाने १६ अटींवर  सभेला सशर्त परवानगी दिली आहे.

अखेर आता औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची सभा होणार हे आता निश्चित झालं आहे.राज यांच्या सभेला परवानगी दिली जाणार की नाही? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, आज अखेर राज ठाकरे यांच्या सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज ठाकरे यांच्या सभेला अटीशर्थींसह परवानगी देण्यात आलीय. तशी माहिती औरंगाबाद पोलिसांकडून देण्यात आली आहे. या अटीशर्थींमध्ये कुणावर वैयक्तिक टीका न करणे, तसंच धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी बाळगणे या महत्वाच्या अटींचा समावेश आहे. त्याचबरोबर राज यांच्या सभेसाठी अजून जवळपास १६ अटी टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

या सभेसाठी २ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून या सभेला केवळ १५ हजार लोकांना परवानगी असली तरी लोकांना कसे थांबवणार असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांच्या तब्बल 16 अटी

१. सदर जाहीर सभा दिनांक ०१/०५/२०२२ रोजी १६.३० ते २१.४५ या वेळेतच आयोजीत करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेस कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.
२. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वपशिस्त पाळावी. सभेला येतांना व परत जातांना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी हुल्लडबाजी असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
३. सभे साटी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलीसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना चाव्या त्या वाहनांनी शहरात व शहराबाहेर प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावे. सभेला आलेल्या नागरीकांना त्यांचे वाहने दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन ) पाफोगसाठी निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पाकोग करण्याच्या सुचना द्याव्यात. सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रैली काढू नये. त्याच प्रमाणे श्री. राज ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आलो असुन आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरुन परत जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढु नये.
४. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगु नये अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदोचा भंग करु नये.
५. अट क्र. २.३.४ बाबत समेत सहभागी होणान्या नागरीकांना कळविण्याची जबाबदारी संयोजकांची राहील.
६. सदर कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरून निमंत्रीत करण्यात आलेल्या नागरीकांच्या वाहनांचो शहर / गावांना अनुसरुन संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग, येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही माहीती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक सिटीचौक यांचे कडे घावो.
७. सभा स्थानाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा १५००० इतको असल्यामुळे त्याठिकाणी १५००० पेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये, अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली. अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जवाबदार धरले जाईल,
८. सभास्थानो सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी निर्देशीत केलेल्या ठिकाणी मजबुत बॅरीकेटस उभारावे. सभेसाटो येणान्या प्रत्येक नागरीकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती तपासणी (Frisking) करण्याचा अधिकार पोलोसांना राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी.
९. सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा परंपरा या वरून कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही अगर त्याविरूध्द चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही, याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.
१०. सभेसाठी वापरण्यात येणान्या ध्वनिक्षेपका यावत मा.सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदुण (नियंत्रण व नियमन) नियम २००० नुसार परिशिष्ट नियम ३(१) ४(१) अन्वयेक्षेत्र औद्योगिक क्षेत्र – ७५ डेसीबलव्यापारी क्षेत्र – ६५ डेसीबलनिवासी क्षेत्र – ५५ डेसीबलशांतता क्षेत्र – ५० डेसीबलबरील प्रमाणे आवाजाची मर्यादा असायी, वरील अटींचा भंग केल्यास पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ च्या कलम १५ अन्वये ५ वर्ष इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची आणि रु. १,००,०००/- ( एक लाख फक्त) इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकते,
११. सदर कार्यक्रमा दरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, अॅम्बुलन्स, दवाखाना, मेडीकल, विजपुरवठा, पाणीपुरवटा दळव वळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
१२. सभेच्या दिवशी वाहतुक नियमनासाठी या कार्यालया कडुन काढली जाणारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५९ कलम ३६ अन्वयेची अधिसुचना सर्व संयोजक, वक्ते व सभेला येणाऱ्या नागरीकांना बंधनकारक राहील.
१३. सभेसाठी येणान्या महिला व पुरुपासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहची व्यवस्था करावी.
१४. सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, चॅरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थीतीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही विघाड झाल्यास पर्यायो विद्युत यंत्रणेची ( जनरेटरचो) व्यवस्था अगोदरच करावी.

१५. सदर कार्यक्रमा दरम्यान मिटाई व अन्नदान वाटप होत असल्यास अन्न व मिटाईतुन कोणासही विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
१६. हा कार्यक्रम सुव्यवस्थीत पणे पार पाडण्यासाठी आपणास घालून दिलेल्या उपरोक्त अटींचे व शर्तीचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमाचे सर्व संयोजक व यतं यांच्यावर प्रचलित विधी, उपविधी व नियमानुसार कारवाई केली जाईल व अशा कारवाई दरम्यान ही नोटीस मा. न्यायालयात पुरावा म्हणुन वापरलो जाईल याची नोंद घ्यावी. जा.क्र. विशा-५/आदेश/औ बाद/ २०२२-२५७५ औरंगाबाद शहर दिनांक २२/०४/२०२२ रोजी महाराष्ट्र पोलोस अधिनियम १९५१ कलम ३७(१४३) अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाला अनुसरून हो परवानगी.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!