अनोळखी मोबाईल नंबरपासून आता मोबाईल धारकांची सुटका होणार

0

नवी दिल्ली – अनेकजण मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी कॉल पासून त्रस्त आहेत.सध्या ज्या व्यक्तीचा नंबर सेव्ह केला आहे त्याचेच नाव मोबाईल स्क्रीनवर दिसते.अनोळखी नंबर अनेकदा जंक कॉल असतो.आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे अशा नंबरर्स वरून घडले आहेत.पण आता अनोळखी मोबाईल नंबरपासून ग्राहकांची लवकरच सुटका होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडून महत्वाची सेवा सुरू केली जाणार असून, मोबाईलवर येणाऱ्या प्रत्येक फोन करणाऱ्याचे नाव स्क्रीनवर दिसणार आहे.

अनोळखी कॉल शोधण्यासाठी युजर्सकडून ट्रूकॉलर (Truecaller) या ऍपचा वापर केला जातोय.परंतु यातून प्रत्येकवेळेस खात्रीशीर माहिती मिळेलच अशी शक्यता कमीच असते. तसेच Truecalle rकडून मोबाईलमधील डाटा विकण्याची शक्यता वर्तवण्याच्या बातम्या ही आल्या आहेत.यावर उपाय म्हणून ‘ट्राय’ने केवायसी आधारे फिचर सुरू करण्याची योजना आखली आहे. कॉल कोणाचा ही माहिती शंभर टक्के यातून मिळेल, असा ‘ट्राय’चा दावा आहे.

ज्याच्या नावावर सीम कार्ड त्याचे नाव
‘ट्राय’च्या या योजनेत केवायसी हा महत्वाचा मुद्दा असणार आहे. केवायसी फॉर्मवर सिमकार्ड वापरकर्त्याचे जे नाव असेल तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना कॉल केल्यावर दिसणार आहे. केवायसी सखोल तपासण्याची जबाबदारी संबंधित कंपन्यांवर असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!