नवी दिल्ली, दि. ४ मे २०२५ – Baba Vanga Prediction पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा तणावपूर्ण झाले असून युद्धाचे ढग घोंघावत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अंध भविष्योक्ते बाबा वेंगाची एक जुनी भविष्यवाणी सध्या चर्चेत आली आहे. त्यांनी २०२५ साली भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा संघर्ष होईल, असा इशारा दिला होता.
बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या पूर्वी खऱ्या ठरल्या आहेत – मग ती २००४ ची त्सुनामी असो, ९/११ चा हल्ला किंवा कोरोना महामारी. त्यामुळे त्यांच्या भारत-पाक युद्धाविषयीच्या भाकिताने आता पाकिस्तानमध्ये खळबळ उडवली आहे.
सीमेवर सध्या युद्धजन्य हालचालींना वेग आला असून पाकिस्तानने रणगाडे आणि सैन्य सज्ज केले आहेत. तर भारताच्या तिन्ही सैन्यदलांनीही प्रहारासाठी तयारी केली आहे. राफेल, सुखोई, ब्रम्होस सारखी शस्त्रसज्जता उभी राहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्पष्ट शब्दांत दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याची भूमिका मांडली आहे. दिल्लीतील बैठकांचे सत्र सुरू असून निर्णय केवळ वेळेच्या प्रतीक्षेत असल्याचे सूत्रांकडून समजते.
बाबा वेंगाच्या या भविष्यवाणीने युद्धाच्या पार्श्वभूमीवर नवा तणाव निर्माण केला आहे. पाकिस्तानसाठी ही परिस्थिती गंभीर असून देशाच्या भवितव्यावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.
बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये झाला होता. त्यांचा मृत्यू १९९६ झाला होता. लहानपणी झालेल्या एका दुर्घटनेत बाबा वेंगा यांनी दृष्टी गमावली होती. त्या घटनेनंतरच त्यांना भविष्य पाहण्याची शक्ती (Baba Vanga Prediction) मिळाल्याचं म्हटलं जातं.त्यामुळे भारत -पाकिस्तान युद्धाबद्दल त्यांनी केलेल्या भविष्यवाणी मुळे पाकिस्तान ला मात्र धडकी भरली आहे.बाबा वेंगा यांच्या मते २०२५ मध्ये माणुसकीच्या अधोगतीची सुरुवात होणार आहे. यामागे युद्ध हे सर्वांत मोठं कारण ठरू शकतं.