राज ठाकरे -उद्धव ठाकरे युतीचा मुहूर्त ठरला !महाराष्ट्राच्या राजकारणात नवा रंग
आता महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड :आता "ठाकरे सोबत ठाकरे"
📍 मुंबई, दि. ६ जून २०२५ – Raj-Uddhav Thackeray Alliance महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक वळण घेणारा क्षण जवळ आला आहे. अनेक वर्षांच्या राजकीय दुराव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. ही शक्यता आता जवळजवळ निश्चित झाली आहे, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
✅ “ठाकरे विरुद्ध ठाकरे” आता “ठाकरे सोबत ठाकरे”?(Raj-Uddhav Thackeray Alliance)
काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी म्हटले होते,
“महाराष्ट्र मोठा आहे, आमच्यातले वाद किरकोळ आहेत. मोठ्या उद्दिष्टासाठी एकत्र येणं शक्य आहे.”राज ठाकरे यांनी पुढे स्पष्ट केले की, “या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे. माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. मी ते पाहतो आहे.”
याच मुलाखतीनंतर उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत स्पष्ट संकेत दिले,“जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते नक्कीच घडेल. उद्धव ठाकरे यांनीही सार्वजनिकरित्या युतीसाठी सकारात्मक संकेत दिले. त्यांनी म्हटले, “मी भांडणं मिटवून टाकली चला… किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मीसुद्धा तयार आहे, मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो.”
🔥 बदलाची सुरुवात : नाशिक आणि मुंबईतील हलचाली
कालच नाशिकमध्ये मनसेच्या नव्या कार्यालयाच्या पूजेसाठी उद्धव गटातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र प्रतिमेची उपस्थिती ही चर्चेचा विषय बनली. त्याचवेळी मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांमध्ये “ठाकरे ब्रॅण्ड पुन्हा एकत्र यावा” ही भावना उफाळून आली आहे.
मुहूर्त ठरला! १४ जूनला ऐतिहासिक भेट?
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, १४ जून २०२५ रोजी राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या भेटीला जाणार आहेत. ही भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
याआधीच दक्षिण मुंबईतील एका खासगी ठिकाणी दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाल्याचीही माहिती पुढे आली आहे. यात महाविकास आघाडीच्या विस्ताराचा विषय चर्चेत आला असून, मनसेला या युतीत सामावून घेण्यावर विचार सुरू असल्याचे समजते.
🎙️ नेत्यांची प्रतिक्रिया:
🗣️ राज ठाकरे म्हणाले:
“राजकारणात समान विचारांच्या लोकांशी संवाद आवश्यक आहे. पुढचे काही दिवस स्पष्टता देतील.”
🗣️ उद्धव ठाकरे म्हणाले:
“राजकारण वैयक्तिक भावनांनी नव्हे तर जनहिताच्या विचारांनी चालते.”
🧠 राजकीय विश्लेषक काय म्हणतात?
मराठी अस्मिता पुन्हा जागृत होईल.
शहरी मतदार राज ठाकरे यांच्याबरोबर,तर ग्रामीण आणि पारंपरिक मतदार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहतील.
ही युती भाजप-शिंदे गटासाठी मोठे राजकीय आव्हान ठरू शकते.
मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होऊ शकतो.