नाशिक ( प्रतिनिधी ) : सालाबाद प्रमाणे येऊ घातलेल्या गणेशोत्सवासाठी नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळातर्फे विविध मुद्यांबाबत नाशिक पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे .दि ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या गणपती उत्सवाबाबत नाशिक पोलीस आयुक्त याच्याशी चर्चा करून नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळातर्फे पोलीस खात्याकडून विविध परवानग्या बाबत नासिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्या सह विविध पदाधिकाऱ्यांतर्फे निवेदन देण्यात आले .
निवेदनातील प्रमुख मागण्या
१) सार्वजनिक गणेश मंडळांना सालाबादप्रमाणे देण्यात येणाऱ्या परवानग्या या तशाच ठेवण्यात याव्यात.
२) मिरवणूक संपेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात यावी .
३) डी जे वाजवण्यास परवानगी द्यावी .
४) ज्या मंडळाच्या गणेश उत्सवाचे आगमन सोहळे असतील त्या मंडळाच्या ठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात यावेत व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा . .
५)गणेश मंडळांना परवानगी देतांना कागदपत्रांसाठी अडवणुकीचे धोरण बाळगू नये . सर्व परवानग्या या ” एक खिडकी योजना ” .अंतर्गत देण्यात याव्यात .
६) गणपती स्थापनेच्या दिवसापासून शेवटच्या दिवसपर्यंत गणपती बसविण्याची व मंडप टाकण्याची परवानगी देण्यात यावी .
७) सार्वजनिक गणेश मंडळ व मंडप येथे पोलीस बंदोबस्त देण्यात यावा .
८) कोरोना महामारी मुळे मागील दोन वर्षांमध्ये ज्या ज्या मंडळांनी गणेशोत्सवासाठी परवानगी घेतली नाही त्या मंडळांची या वर्षात अडवणूक होऊ नये .
९)सर्व परवानग्या देण्याचे अधिकार त्या त्या भागातील स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात यावेत .
१०)गणेशोत्सव परवानगी देण्यासाठी ” एक खिडकी योजना “लवकरात लवकर सुरु करण्यात यावी व तेथे सक्षम अधिकारी ( पोलीस अधिकारी , महानगर पालिका अधिकारी , वाहतूक पोलीस अधिकारी , अग्निशामक दलाचा अधिकारी ) नेमण्यात येऊन सर्व विभागाच्या परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात याव्यात .
११) पोलीस आयुक्तालयामार्फत एक असा अधिकारी नेमावा कि जो सर्व गणेश मंडळांच्या अडचणी दूर करू शकेल .
अश्या विविध मागण्याचे निवेदन पोलीस आयुक्ताना देण्यात आले व लवकरच या विषयाची बैठक बोलावण्यात येईल असे आश्वासन या वेळी देण्यात आले . या बैठकीस नासिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे , गजानन शेलार , विनायक पांडे , राजेंद्र बागुल , हेमंत जगताप , पोपटराव नागपुरे , महेश महंकाळे , करणसिंग बावरी , शैलेश सूर्यवंशी , सत्यम खंडाळे , गणेश बर्वे , बबलू परदेशी , कुणाल मगर , गोविंद कांकरिया आधी उपस्थित होते .